शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सुळे डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:40 IST

सुळे डाव्या कालव्याचे रब्बी हंगामासाठी आवर्तन ठरविण्यासाठी विसापूर येथे आयोजित पाणी परिषदेत कालव्याचे पाणी खामखेड्यासाठी सोडण्यात यावे तसेच खामखेडा व सावकी येथील पाझर तलावासाठी गेट टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

खामखेडा : सुळे डाव्या कालव्याचे रब्बी हंगामासाठी आवर्तन ठरविण्यासाठी विसापूर येथे आयोजित पाणी परिषदेत कालव्याचे पाणी खामखेड्यासाठी सोडण्यात यावे तसेच खामखेडा व सावकी येथील पाझर तलावासाठी गेट टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चालू वर्षी तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याने रब्बी हंगामात सुळे डाव्या कालव्याचे तीन आवर्तन ठरविण्यासाठी सावकी, खामखेडा, पिळकोस, विसापूर, भादवन, बिजोरे, घनगरपाडा आदी भागातील शेतकऱ्यांनी आमदार जे. पी. गावित यांच्या अध्यक्षतेखाली विसापूर येथे सुळे डावा कालवा पाणी आरक्षण परिषदेचे आयोजन केले होते. दरवर्षी उन्हाळ्यात सुळे डाव्या कालव्यास रब्बी हंगामासाठी पिळकोस गावाच्या शिवापर्यंत पाणी सोडण्यात येते, तेव्हा हे पाणी पुढे खामखेडा-सावकी शिवारापर्यंत सोडण्यात यावे तसेच या काळव्याखाली खामखेडा व सावकी पाझर तलावसमोरील कालव्यास गेट टाकण्यात यावे अशी मागणी खामखेडा येथील शेतकºयांनी पाणी परिषदेत केली. खामखेडा व सावकी शिवारातील कालव्यास पाझर तलावाच्या नाल्यावर गेट टाकल्यास पावसाळ्यात या कालव्यास पाणी सोडल्यास पूरपाण्याने हे तलाव भरल्यास भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. सुळे डाव्या कालव्याच्या पाझर तलावासमोरील नाल्यावर गेट टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच बापू शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, माजी सरपंच संतोष मोरे, दादाजी बोरसे, संजय बच्छाव, दीपक मोरे, साहेबराव शेवाळे, रमेश शेवाळे, भिका शेवाळे आदी शेतकरी उपस्थित होते.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदतचालू वर्षी अल्पपावसामुळे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. आताच शिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याअभावी लागवड केलेली पिके सोडून देण्याची वेळ अनेक शेतकºयांवर आली आहे. विहिरींना पाणी नसल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा सुळे डाव्या कालव्याचे पाणी खामखेडा व सावकी शिवारापर्यंत सोडल्यास थोड्याफार प्रमाणात पाणी मुरून विहिरींना पाणी उतरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी