शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बागलाण दुष्काळी तालुका जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:51 IST

बागलाण तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट गडद झाले आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट गडद झाले आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. पावसाने दडी मारल्यास रब्बीच्या सुद्धा आशा मावळणार आहेत. या गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनाने बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची माहिती मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार चव्हाण यांच्या भेटी दरम्यान दिली. यावेळी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.  शासनाने या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा व सर्व प्रकारच्या दुष्काळी सेवा - सुविधा आणि लाभ देऊन जनतेला दिलासा द्यावा अशी आग्रही मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाºयांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.अजूनही टॅँकरद्वारेच पाणीपुरवठादोन महिने उलटूनही बागलाण तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी तालुक्यात सर्व पेरण्या देखील झालेल्या नसून पावसाने ओढ दिल्याने केलेल्या पेरण्या धोक्यात आलेल्या आहेत. विहिरींनी देखील तळ गाठल्याने शेतकरी आर्थिक व अस्मानी संकटात सापडला आहे. शेतातील उभी पिके करपून चालली असून दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे शेतकºयांचे भांडवल वाया जाणार आहे. तालुक्यातील धरणातही पुरेसा पाणीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे गावकºयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गावात अजूनही टॅँकरद्वारा पाणीपुरवठा सुरु आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ