शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:49 IST

गेल्या वर्षभरानंतर शाळा, महाविद्यालये आता हळूहळू पूर्वपदावर येत असून सिन्नर आगाराकडून मात्र कमी बस असल्याकारणाने खेडेगावातील शालेय विद्यार्थ्यांची ...

गेल्या वर्षभरानंतर शाळा, महाविद्यालये आता हळूहळू पूर्वपदावर येत असून सिन्नर आगाराकडून मात्र कमी बस असल्याकारणाने खेडेगावातील शालेय विद्यार्थ्यांची ताराबंळ होत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक खेडोपाडी नियमित येणारी एकच बस फेऱ्या मारत असल्याने विद्यार्थी बसच्या खाली राहिला तर परत बस फेरी मारून येईपर्यंत शाळेची वेळ निघून जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. तालुक्यातील ठाणगाव,पाडळी,आडवाडी, सोनांबे, कोनांबे, दापूर, पाढुर्ली आदी पश्चिम भागातील खेडेगावातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची शिक्षणासाठी सिन्नरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ये-जा होत असते. सिन्नर आगारातील कमी बस सेवेमुळे शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी कमी बस असल्याने विद्यार्थ्यांना तासनतास बसावे लागत आहे. सिन्नर आगारातील केवळ ५५ गाड्यांनीच संपूर्ण प्रवाससेवा सुरू आहे. सिन्नर आगारातील १० बस मुंबई येथे वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या आहेत. या बस पुन्हा बोलविणे गरजेचे असून याबाबत सिन्नर आगाराच्यावतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळा असल्याने विद्यार्थी पास काढण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नाही. त्यामुळे आगाराच्यावतीने दररोजचे उत्पन्न वाढण्यासाठी बस फेऱ्या वाढविण्याची मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे .

कोट....

ग्रामीण भागातून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी पास काढून घ्यावे. जितक्या प्रमाणात पास वाढले जातील त्याप्रमाणे त्या-त्या भागातील बसेसची संख्या वाढविण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांकडून पूर्ण महिनाभराच्या पासची रक्कम आकारणी केली जात नसून फक्त दहा दिवसांचीच आकारणी केली जात आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी पास काढून घ्यावेत म्हणजे त्या भागात बसेस सोडता येतील.

- एस. एच. काळे, स्थानक प्रमुख

कोट....

पूर्वी आगारात असलेली वाहनांची स्थिती पूर्ण केल्यास कामगारांना नियमित कामगिरी मिळणेस सुलभ होऊन विद्यार्थी संख्या व प्रवासी संख्या वाढ होत असल्याने बसेस वाढ होणे गरजेचे आहेत.

- देवा सांगळे, सचिव, एसटी कामगार सेना