शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सुरळीत शेतमाल लिलावासाठी शासन हस्तक्षेपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 17:26 IST

अंदरसूल : कोरोनाने शेती व्यवसाय देखिल संकटात आला असून सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत, त्यात आता वादळी पावसाची भर पडल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंदरसूल : कोरोनाने शेती व्यवसाय देखिल संकटात आला असून सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत, त्यात आता वादळी पावसाची भर पडल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.शेतकरीवर्गाने चांगल्या भावाच्या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवला. कांद्याला चांगला दर मिळेल असे वाटत असतांना पाऊस सुरू झाला. पाऊस व त्यानिमित्ताने बदललेल्या वातावरणाने चाळीतील कांदा खराब होवू लागला. पिक पेरणीसाठी, खतांसाठी भांडवलाची गरज असतांना साठवलेला कांदा शेतकरी विक्र ीसाठी बाजारात आणत असतात. पण या वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव व त्यापाठोपाठ वादळी पाऊस या संकटाने कांदा बळी जात आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मातीमोल भावात कांदा विक्र ी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बाजार समित्या चालू- बंद होत राहिल्याने शेतकरी माल असून विक्र ी करू शकला नाही. पावसातही शेतकरी कांदा विक्र ीसाठी बाजारसमितीत आणत होते मात्र, सलग चार दिवस वेगवेगळ्या कारणाने समित्या बंद राहिल्या. तसेच लगतच्या वैजापूर व कोपरगाव बाजार समितीही कोरोनामुळे बंदच आहे.सोमवारी, (दि. २७) फक्त अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा लिलाव झाले. सर्वसाधारणपणे अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा शंभर-दीडशेच्या वर ट्रॅक्टर येत नाही. पण सोमवारी येवल्यासह वैजापूर, कोपरगाव तालुक्यातून मोठी आवक झाल्याने ५००च्या पुढे टॅ्रक्टर आवक झाली. आवक वाढल्याने बाजारभाव घसरतात या नियमाने भावात मंदी आली. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.चौकट-पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कांदा खराब झाला आहे. कांद्याला भाव नाही, बाजार समित्या बंद, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने सर्व बाजार समित्या नियमीत व सुरळीत सुरू रहाव्यात यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतमालांचे लिलाव सुरळीत झाल्यास शेतकºयांना थोडासा दिलासा तरी मिळेल.- मकरंद सोनवणे, सभापती, उपबाजार आवार, अंदरसूल.(फोटो २७ मार्केट यार्ड)

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड