शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुरळीत शेतमाल लिलावासाठी शासन हस्तक्षेपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 17:26 IST

अंदरसूल : कोरोनाने शेती व्यवसाय देखिल संकटात आला असून सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत, त्यात आता वादळी पावसाची भर पडल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंदरसूल : कोरोनाने शेती व्यवसाय देखिल संकटात आला असून सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत, त्यात आता वादळी पावसाची भर पडल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.शेतकरीवर्गाने चांगल्या भावाच्या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवला. कांद्याला चांगला दर मिळेल असे वाटत असतांना पाऊस सुरू झाला. पाऊस व त्यानिमित्ताने बदललेल्या वातावरणाने चाळीतील कांदा खराब होवू लागला. पिक पेरणीसाठी, खतांसाठी भांडवलाची गरज असतांना साठवलेला कांदा शेतकरी विक्र ीसाठी बाजारात आणत असतात. पण या वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव व त्यापाठोपाठ वादळी पाऊस या संकटाने कांदा बळी जात आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मातीमोल भावात कांदा विक्र ी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बाजार समित्या चालू- बंद होत राहिल्याने शेतकरी माल असून विक्र ी करू शकला नाही. पावसातही शेतकरी कांदा विक्र ीसाठी बाजारसमितीत आणत होते मात्र, सलग चार दिवस वेगवेगळ्या कारणाने समित्या बंद राहिल्या. तसेच लगतच्या वैजापूर व कोपरगाव बाजार समितीही कोरोनामुळे बंदच आहे.सोमवारी, (दि. २७) फक्त अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा लिलाव झाले. सर्वसाधारणपणे अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा शंभर-दीडशेच्या वर ट्रॅक्टर येत नाही. पण सोमवारी येवल्यासह वैजापूर, कोपरगाव तालुक्यातून मोठी आवक झाल्याने ५००च्या पुढे टॅ्रक्टर आवक झाली. आवक वाढल्याने बाजारभाव घसरतात या नियमाने भावात मंदी आली. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.चौकट-पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कांदा खराब झाला आहे. कांद्याला भाव नाही, बाजार समित्या बंद, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने सर्व बाजार समित्या नियमीत व सुरळीत सुरू रहाव्यात यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतमालांचे लिलाव सुरळीत झाल्यास शेतकºयांना थोडासा दिलासा तरी मिळेल.- मकरंद सोनवणे, सभापती, उपबाजार आवार, अंदरसूल.(फोटो २७ मार्केट यार्ड)

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड