शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सुरळीत शेतमाल लिलावासाठी शासन हस्तक्षेपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 17:26 IST

अंदरसूल : कोरोनाने शेती व्यवसाय देखिल संकटात आला असून सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत, त्यात आता वादळी पावसाची भर पडल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंदरसूल : कोरोनाने शेती व्यवसाय देखिल संकटात आला असून सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत, त्यात आता वादळी पावसाची भर पडल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.शेतकरीवर्गाने चांगल्या भावाच्या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवला. कांद्याला चांगला दर मिळेल असे वाटत असतांना पाऊस सुरू झाला. पाऊस व त्यानिमित्ताने बदललेल्या वातावरणाने चाळीतील कांदा खराब होवू लागला. पिक पेरणीसाठी, खतांसाठी भांडवलाची गरज असतांना साठवलेला कांदा शेतकरी विक्र ीसाठी बाजारात आणत असतात. पण या वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव व त्यापाठोपाठ वादळी पाऊस या संकटाने कांदा बळी जात आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मातीमोल भावात कांदा विक्र ी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बाजार समित्या चालू- बंद होत राहिल्याने शेतकरी माल असून विक्र ी करू शकला नाही. पावसातही शेतकरी कांदा विक्र ीसाठी बाजारसमितीत आणत होते मात्र, सलग चार दिवस वेगवेगळ्या कारणाने समित्या बंद राहिल्या. तसेच लगतच्या वैजापूर व कोपरगाव बाजार समितीही कोरोनामुळे बंदच आहे.सोमवारी, (दि. २७) फक्त अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा लिलाव झाले. सर्वसाधारणपणे अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा शंभर-दीडशेच्या वर ट्रॅक्टर येत नाही. पण सोमवारी येवल्यासह वैजापूर, कोपरगाव तालुक्यातून मोठी आवक झाल्याने ५००च्या पुढे टॅ्रक्टर आवक झाली. आवक वाढल्याने बाजारभाव घसरतात या नियमाने भावात मंदी आली. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.चौकट-पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कांदा खराब झाला आहे. कांद्याला भाव नाही, बाजार समित्या बंद, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने सर्व बाजार समित्या नियमीत व सुरळीत सुरू रहाव्यात यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतमालांचे लिलाव सुरळीत झाल्यास शेतकºयांना थोडासा दिलासा तरी मिळेल.- मकरंद सोनवणे, सभापती, उपबाजार आवार, अंदरसूल.(फोटो २७ मार्केट यार्ड)

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड