शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

सुरळीत शेतमाल लिलावासाठी शासन हस्तक्षेपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 17:26 IST

अंदरसूल : कोरोनाने शेती व्यवसाय देखिल संकटात आला असून सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत, त्यात आता वादळी पावसाची भर पडल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंदरसूल : कोरोनाने शेती व्यवसाय देखिल संकटात आला असून सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत, त्यात आता वादळी पावसाची भर पडल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.शेतकरीवर्गाने चांगल्या भावाच्या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवला. कांद्याला चांगला दर मिळेल असे वाटत असतांना पाऊस सुरू झाला. पाऊस व त्यानिमित्ताने बदललेल्या वातावरणाने चाळीतील कांदा खराब होवू लागला. पिक पेरणीसाठी, खतांसाठी भांडवलाची गरज असतांना साठवलेला कांदा शेतकरी विक्र ीसाठी बाजारात आणत असतात. पण या वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव व त्यापाठोपाठ वादळी पाऊस या संकटाने कांदा बळी जात आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मातीमोल भावात कांदा विक्र ी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बाजार समित्या चालू- बंद होत राहिल्याने शेतकरी माल असून विक्र ी करू शकला नाही. पावसातही शेतकरी कांदा विक्र ीसाठी बाजारसमितीत आणत होते मात्र, सलग चार दिवस वेगवेगळ्या कारणाने समित्या बंद राहिल्या. तसेच लगतच्या वैजापूर व कोपरगाव बाजार समितीही कोरोनामुळे बंदच आहे.सोमवारी, (दि. २७) फक्त अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा लिलाव झाले. सर्वसाधारणपणे अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा शंभर-दीडशेच्या वर ट्रॅक्टर येत नाही. पण सोमवारी येवल्यासह वैजापूर, कोपरगाव तालुक्यातून मोठी आवक झाल्याने ५००च्या पुढे टॅ्रक्टर आवक झाली. आवक वाढल्याने बाजारभाव घसरतात या नियमाने भावात मंदी आली. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.चौकट-पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कांदा खराब झाला आहे. कांद्याला भाव नाही, बाजार समित्या बंद, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने सर्व बाजार समित्या नियमीत व सुरळीत सुरू रहाव्यात यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतमालांचे लिलाव सुरळीत झाल्यास शेतकºयांना थोडासा दिलासा तरी मिळेल.- मकरंद सोनवणे, सभापती, उपबाजार आवार, अंदरसूल.(फोटो २७ मार्केट यार्ड)

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड