शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

करंजवणचे आवर्तन बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2022 11:14 PM

दिंडोरी : तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यांतील शेती व शहरांना कडक उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील स्थानिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्दे३६ टक्के पाणीसाठा : स्थानिक जनतेत नाराजीचा सूर

दिंडोरी : तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यांतील शेती व शहरांना कडक उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील स्थानिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

करंजवण धरणात चालू वर्षी शंभर टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, सलग एक महिन्यापासून आवर्तन चालू असल्यामुळे सध्या धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. भविष्यातील कडळ उन्हाळ्याचा विचार करता तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये करंजवण धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून पालखेड धरणात पाणीसाठा केला जातो. याचा परिणाम म्हणून कादवा नदीचे पात्र संपूर्णपणे कोरडे पडते. कादवा नदीकाठावरील पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे करंजवण धरणातून एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी वांरवार होत आहे.धरणातील पाणीसाठाकरंजवण - ३६ टक्केवाघाड - २४ टक्केपुणेगाव - ३५ टक्केओझरखेड - ५७ टक्केपालखेड - ६४ टक्केतिसगाव - ४८ टक्केभविष्यात स्थानिक जनतेचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातून कादवा नदीपात्रात एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात आले पाहिजे. स्थानिक जनतेला पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची दखल पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी घ्यावी.- जयदीप देशमुख, करंजवण.

टॅग्स :water transportजलवाहतूकFarmerशेतकरी