शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

राजापूर गटात चारा छावणी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:12 IST

दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या राजापूर जिल्हा परिषद गटात चारा छावणी सुरू करावी यासह दुष्काळी कामे सुरू करावीत या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. नायब तहसीलदार बी.एम. हांडगे यांनी निवेदन स्वीकारले.

राजापूर : दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या राजापूर जिल्हा परिषद गटात चारा छावणी सुरू करावी यासह दुष्काळी कामे सुरू करावीत या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. नायब तहसीलदार बी.एम. हांडगे यांनी निवेदन स्वीकारले.  राजापूर गट हा कायमस्वरूपी दुष्काळी स्थितीचा आहे. या गटात शेतीला सिंचनासाठी पाटपाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने डोंगराळ भाग व हलकी जमीन असल्याने सर्व चारा व पिके पावसाअभावी जळून खाक झाली आहेत. तालुक्यातील दुष्काळाच्या झळा गटाला सोसाव्या लागत आहेत. चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे चारा पाण्यावाचून शेतोपयोगी जनावरे विकावी लागतील नाही तर दावणीलाच चारा पाण्याअभावी मरतील अशी भयाण स्थिती उद्भवली आहे.राजापूर हे गाव येवला व नांदगाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी चारा छावणी सुरू केल्यास दोन्ही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकरी वर्गास या छावणीचा उपयोग होईल. या मागणीचा विचार करून राजापूर येथे त्वरित चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.  यावेळी भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दत्ता सानप, तालुका सरचिटणीस प्रा. नानासाहेब लहरे, कृष्णा कव्हात, संतोष काटे उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, दिंडोरी लोकसभा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना पाठविण्यात आल्या आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी