शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:16 IST

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु पावसाच्या लपंडावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची ...

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु पावसाच्या लपंडावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. दीड महिन्यापासून अधून-मधून पडणाºया उन्हाच्या तीव्रतेमुळे मका, सोयाबीन, टोमटो, भुईमूग या पिकांना पावसाची गरज भासत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे मका , सायोबीनसारख्या पिकांचे शेंडे करपण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेले पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून पिकांना पाणी मिळणार का? जर पालखेड आवर्तनातून पाणी मिळाले तर मानोरी बुद्रुक, देशमाने, नेऊरगाव आदी परिसरातील खरीप पिकांना जीवदान मिळेल. काही भागात मृग नक्षत्रात पडलेल्या पहिल्याच दमदार पावसानंतर जमिनीतील ओलावा, गारवा कमी पडू लागला असून, दोन महिने उलटूनही पिके आजही थोड्या प्रमाणात तग धरून आहेत. उन्हाळ्यात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई अजूनही ग्रामीण भागात सुरूच असल्याने वाड्या-वस्त्यावरील नागरिक आजही पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील हातपंपाला पाणी कमी पडले आहे. पालखेडच्या आवर्तनातून देशमाने, मानोरी, मुखेड, सत्यगाव या चारही गावांतील बंधारे भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. हे आवर्तन मिळाल्यास किमान पिकांसाठी केलेली मेहनत, कष्ट वाया जाणार नाही अशा शब्दात शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.वितरिका नंबर २१ ही सर्वात लहान वितरिका असून, पाणी वितरिकेच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी जात नसल्याने या वितरिकेच्या रु ंदीकरणाची व खोली वाढविण्याची गरज आहे. या वितरिकेत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे झाल्याने पाण्याचा प्रवाह जोरात होत नसल्याने आलेल्या आवर्तनाचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागाने तत्काळ झुडपांचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. - नंदाराम शेळके, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटीदोन महिन्यांपासून पाऊस पडत नसल्याने पाण्याविना पिके करपू लागल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पीकविमा अर्जाची मुदत शासनाने वाढवावी. - बाळासाहेब वावधाने, शेतकरी 

टॅग्स :DamधरणWaterपाणी