शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:16 IST

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु पावसाच्या लपंडावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची ...

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु पावसाच्या लपंडावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. दीड महिन्यापासून अधून-मधून पडणाºया उन्हाच्या तीव्रतेमुळे मका, सोयाबीन, टोमटो, भुईमूग या पिकांना पावसाची गरज भासत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे मका , सायोबीनसारख्या पिकांचे शेंडे करपण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेले पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून पिकांना पाणी मिळणार का? जर पालखेड आवर्तनातून पाणी मिळाले तर मानोरी बुद्रुक, देशमाने, नेऊरगाव आदी परिसरातील खरीप पिकांना जीवदान मिळेल. काही भागात मृग नक्षत्रात पडलेल्या पहिल्याच दमदार पावसानंतर जमिनीतील ओलावा, गारवा कमी पडू लागला असून, दोन महिने उलटूनही पिके आजही थोड्या प्रमाणात तग धरून आहेत. उन्हाळ्यात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई अजूनही ग्रामीण भागात सुरूच असल्याने वाड्या-वस्त्यावरील नागरिक आजही पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील हातपंपाला पाणी कमी पडले आहे. पालखेडच्या आवर्तनातून देशमाने, मानोरी, मुखेड, सत्यगाव या चारही गावांतील बंधारे भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. हे आवर्तन मिळाल्यास किमान पिकांसाठी केलेली मेहनत, कष्ट वाया जाणार नाही अशा शब्दात शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.वितरिका नंबर २१ ही सर्वात लहान वितरिका असून, पाणी वितरिकेच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी जात नसल्याने या वितरिकेच्या रु ंदीकरणाची व खोली वाढविण्याची गरज आहे. या वितरिकेत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे झाल्याने पाण्याचा प्रवाह जोरात होत नसल्याने आलेल्या आवर्तनाचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागाने तत्काळ झुडपांचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. - नंदाराम शेळके, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटीदोन महिन्यांपासून पाऊस पडत नसल्याने पाण्याविना पिके करपू लागल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पीकविमा अर्जाची मुदत शासनाने वाढवावी. - बाळासाहेब वावधाने, शेतकरी 

टॅग्स :DamधरणWaterपाणी