शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:16 IST

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु पावसाच्या लपंडावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची ...

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु पावसाच्या लपंडावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. दीड महिन्यापासून अधून-मधून पडणाºया उन्हाच्या तीव्रतेमुळे मका, सोयाबीन, टोमटो, भुईमूग या पिकांना पावसाची गरज भासत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे मका , सायोबीनसारख्या पिकांचे शेंडे करपण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेले पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून पिकांना पाणी मिळणार का? जर पालखेड आवर्तनातून पाणी मिळाले तर मानोरी बुद्रुक, देशमाने, नेऊरगाव आदी परिसरातील खरीप पिकांना जीवदान मिळेल. काही भागात मृग नक्षत्रात पडलेल्या पहिल्याच दमदार पावसानंतर जमिनीतील ओलावा, गारवा कमी पडू लागला असून, दोन महिने उलटूनही पिके आजही थोड्या प्रमाणात तग धरून आहेत. उन्हाळ्यात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई अजूनही ग्रामीण भागात सुरूच असल्याने वाड्या-वस्त्यावरील नागरिक आजही पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील हातपंपाला पाणी कमी पडले आहे. पालखेडच्या आवर्तनातून देशमाने, मानोरी, मुखेड, सत्यगाव या चारही गावांतील बंधारे भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. हे आवर्तन मिळाल्यास किमान पिकांसाठी केलेली मेहनत, कष्ट वाया जाणार नाही अशा शब्दात शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.वितरिका नंबर २१ ही सर्वात लहान वितरिका असून, पाणी वितरिकेच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी जात नसल्याने या वितरिकेच्या रु ंदीकरणाची व खोली वाढविण्याची गरज आहे. या वितरिकेत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे झाल्याने पाण्याचा प्रवाह जोरात होत नसल्याने आलेल्या आवर्तनाचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागाने तत्काळ झुडपांचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. - नंदाराम शेळके, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटीदोन महिन्यांपासून पाऊस पडत नसल्याने पाण्याविना पिके करपू लागल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पीकविमा अर्जाची मुदत शासनाने वाढवावी. - बाळासाहेब वावधाने, शेतकरी 

टॅग्स :DamधरणWaterपाणी