शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:16 IST

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु पावसाच्या लपंडावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची ...

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु पावसाच्या लपंडावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. दीड महिन्यापासून अधून-मधून पडणाºया उन्हाच्या तीव्रतेमुळे मका, सोयाबीन, टोमटो, भुईमूग या पिकांना पावसाची गरज भासत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे मका , सायोबीनसारख्या पिकांचे शेंडे करपण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेले पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून पिकांना पाणी मिळणार का? जर पालखेड आवर्तनातून पाणी मिळाले तर मानोरी बुद्रुक, देशमाने, नेऊरगाव आदी परिसरातील खरीप पिकांना जीवदान मिळेल. काही भागात मृग नक्षत्रात पडलेल्या पहिल्याच दमदार पावसानंतर जमिनीतील ओलावा, गारवा कमी पडू लागला असून, दोन महिने उलटूनही पिके आजही थोड्या प्रमाणात तग धरून आहेत. उन्हाळ्यात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई अजूनही ग्रामीण भागात सुरूच असल्याने वाड्या-वस्त्यावरील नागरिक आजही पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील हातपंपाला पाणी कमी पडले आहे. पालखेडच्या आवर्तनातून देशमाने, मानोरी, मुखेड, सत्यगाव या चारही गावांतील बंधारे भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. हे आवर्तन मिळाल्यास किमान पिकांसाठी केलेली मेहनत, कष्ट वाया जाणार नाही अशा शब्दात शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.वितरिका नंबर २१ ही सर्वात लहान वितरिका असून, पाणी वितरिकेच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी जात नसल्याने या वितरिकेच्या रु ंदीकरणाची व खोली वाढविण्याची गरज आहे. या वितरिकेत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे झाल्याने पाण्याचा प्रवाह जोरात होत नसल्याने आलेल्या आवर्तनाचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागाने तत्काळ झुडपांचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. - नंदाराम शेळके, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटीदोन महिन्यांपासून पाऊस पडत नसल्याने पाण्याविना पिके करपू लागल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पीकविमा अर्जाची मुदत शासनाने वाढवावी. - बाळासाहेब वावधाने, शेतकरी 

टॅग्स :DamधरणWaterपाणी