शेतमालाचे पैसे खात्यावर वर्ग करण्याची मागणी

By Admin | Updated: January 20, 2017 00:41 IST2017-01-20T00:41:09+5:302017-01-20T00:41:23+5:30

शेतमालाचे पैसे खात्यावर वर्ग करण्याची मागणी

Demand for farming of money on the account | शेतमालाचे पैसे खात्यावर वर्ग करण्याची मागणी

शेतमालाचे पैसे खात्यावर वर्ग करण्याची मागणी

खामखेडा : शेतकऱ्याने शेतमाल
विक्र ी केल्यानंतर धनादेश न देता पैसे खात्यावर वर्ग करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
केंद्र सरकारने जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आर्थिक तुटवड निर्माण झाल्याने शेतमाल विक्र ी केल्यानंतर व्यापारी शेतकऱ्याला रोख स्वरूपात पैसे न देता बॅँकेचा धनादेश देत आहेत. या धनादेशाचे पैसे खात्यावर जमा होण्यास विलंब होत आहे. सध्या सर्वत्र लाल कांदा व मका काढण्याचा हंगाम चालू आहे. शेतकरी लाल कांदा व मका काढल्यानंतर लगेच विक्र ीसाठी मार्केटमध्ये विक्र ीसाठी नेत आहे. हा माल विक्री झाल्यानंतर आडतदाराकडून रोख पैसे न देता धनादेश देण्यात येत आहे. हा धनादेश शेतकऱ्याला राष्ट्रीयीकृत बॅँकेत जमा करावा लागतो. सध्या बॅँकेत मोठ्या प्रमाणात धनादेश जमा होत असल्याने वेळ आल्यास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी धनादेश जमा करण्यात निघून जातात. परंतु काही धनादेश जमा करूनही शेतकऱ्यांच्या खाती पैसे जमा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला काही वेळेस महिनाभर पैसे मिळण्यास उशीर होतो.
आता सर्वच बॅँका आॅनलाइन जोडल्या गेल्या आहेत. नोटाबंदीला सत्तर दिवसांहून अधिक दिवस होऊनही अजूनदेखील ग्रामीण भागामध्ये भरपूर प्रमाणात चलन उपलब्ध नसल्याने बॅँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. जरी रिझर्व्ह बॅँकेने एटीएममधून दहा हजार रुपये काढता येतील, असे जाहीर केले असले तरी ग्रामीण भागातील बँकांमध्ये अजूनही एटीएमची सोय नाही. तर सर्वच खातेदारांकडे तर एटीएम कार्ड उपलब्ध आहे, असेही नाही. त्यामुळे त्याला अकरा वाजेपर्यंत बॅँक उघडण्याची वाटप पहावी लागते. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागातील बॅँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.(वार्ताहर)

Web Title: Demand for farming of money on the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.