शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कळवण तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:10 IST

गावित यांचा दौरा : पावसाअभावी पिकस्थिती गंभीर

ठळक मुद्देतालुक्यात पावसाळा संपला तरी सरासरीच्या केवळ ५० टक्केपेक्षा कमी प्रमाण असल्याने तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे

पाळे खुर्द : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यामध्ये कळवण या आदिवासी तालुक्याचा शासनाने समावेश न केल्याने कळवण तालुक्यातील जनतेत व आदिवासी बाधवामध्ये नाराजी असून पाऊस उशिरा झाल्याने पिक येणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या यादीत कळवणचा समावेश करावा, अशी मागणी आमदार जे.पी. गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आमदार जे. पी. गावित यांनी कळवण तालुक्यातील विविध गावांतील जाऊन पिकाची पाहणी केली. यावेळी पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तालुक्यात पावसाळा संपला तरी सरासरीच्या केवळ ५० टक्केपेक्षा कमी प्रमाण असल्याने तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी बंधारे कोरडे असून पावसाच्या भरवशावर केलेला हंगाम वाया गेला आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांनी पिके जागविण्याचे आटोकाट प्रयत्न केला मात्र परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने पिके करपून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. भांडवल खर्च वाया गेला आहे. जनावरे आणि माणसांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील शेतजमिनी धोक्यात आल्या असून शेतकºयांना या संकटातून सावरता यावे तसेच कळवण महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून आणेवारी करावी, कळवण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आमदार जे. पी. गावित यांनी दुष्काळी पाहणी दरम्यान सांगितले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ गायकवाड, माकप सेक्रेटरी हेमंत पाटील, टिनू पगार, मोहन जाधव, बाळासाहेब गांगुर्डे, नाना देवरे, अजय पगार आदी शेतकरी आदी उपस्थित होते, 

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ