शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:10 IST

सायखेडा : महावितरण विभागाने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देरात्री वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा.

सायखेडा : महावितरण विभागाने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.सध्या आठ दिवस रात्रीची शेतपंपासाठी वीज दिली जाते, तर आठ दिवस दिवसा दिली जाते; परंतु दिवसा आठ दिवस शेतीपंपासाठी देणाऱ्या विजेचा खेळखंडोबाच, होतो. कारण दहा ते पंधरा मिनिटाला वीज जात असते.रात्रीच्या वेळेला पिकांना पाणी द्यायचे म्हटले तर अनेक शेतकऱ्यांच्या घरी पुरुष माणूस नसतो, तर बरेच ठिकाणी रात्रीच्या वेळेला मोटार चालू करायला गेले असता तेथे शॉक लागून मृत्यूच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. काही ठिकाणी पहाटेच्यावेळी अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यायला हवी. रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका आहे.अनेक ठिकाणी रोहित्राच्या क्षमतेपेक्षा जादा दाब रोहित्रावर असतो. त्यामुळे अनेक वेळा फ्यूज जाणे, डीओ जाणे असे प्रकार घडतात. फ्यूज किंवा डीओ बसवत असताना यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना विजेचा धक्का बसलेला आहे? बऱ्याच शेतकऱ्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे? ? त्यामुळे महावितरणने शेती पंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे?सध्या आठ दिवस दिवसा शेतीपांपासाठी वीज दिली जाते, तर आठ दिवस रात्रीची असते. रात्रीच्या वेळेसच विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याचे प्रमाण जास्त आहे. दिवसा वीजचे घोटाळे आणि रात्री वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा.- संदीप टर्ले, माजी सरपंच, चांदोरी.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज