शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

कांदा निर्यातबंदी उठविण्यासह साठवणूक मर्यादा रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 18:55 IST

लासलगाव : बाजार समिती सभापतींचा केंद्राशी पत्रव्यवहार

ठळक मुद्दे लवकरच येथील बाजार समित्यांमध्ये लेट खरीप (रांगडा) कांदाही मोठ्या प्रमाणावर विक्र ीस येणार आहे

लासलगांव : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत गेल्या १५ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरू असून अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादनात घट झाल्याने मिळणारे दर हे शेतकरी वर्गाला परवडत नसल्याने केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासह कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करावी, या करीता लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापदी सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचेसह राज्याचे मुख्यमंत्री उदद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून विनंती केली आहे.सद्यस्थितीत समितीच्या लासलगांव मुख्य बाजारासह निफाड व विंचुर उपबाजार आवारात दररोज साधारणत: ३० ते ३५ हजार क्विंटल अर्ली खरीप कांद्याची विक्र ी होत आहे. परंतु माहे सप्टेंबर २०१९ पासून संपुर्ण देशभरात कांदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर २०१९ चे अधिसूचनेनुसार भारतातून होणाऱ्या सर्व प्रकारच्या कांद्याचे निर्यातीस प्रतिबंध केला आहे. याशिवाय, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दि. ३ डिसेंबर २०१९ चे आदेशानुसार देशभरातील घाऊक व्यापाऱ्यांना 250 क्विंटलपर्यत (२५ मे. टन) व किरकोळ व्यापाºयांना ५० क्विंटलपर्यंत (५ मे. टन) कांदा साठवणुकीची मर्यादा लागू केल्याने येथील व्यापारी वर्गास त्यांच्या दैनंदीन कांदा खरेदीवर बंधन आलेले आहे. वास्तविक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत विक्र ीस येणा-या अर्ली खरीप कांद्याची टिकवण क्षमता ही कमी असल्याने येथील शेतक-यांना सदरचा कांदा शेतातून काढलेनंतर लगेच विक्र ी केल्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही. त्यामुळे येथील बाजार समित्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर सदरचा कांदा विक्र ीस येत आहे. लवकरच येथील बाजार समित्यांमध्ये लेट खरीप (रांगडा) कांदाही मोठ्या प्रमाणावर विक्र ीस येणार आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यांमधील स्थानिक कांदाही बाजारात दाखल झाला असून मध्यंतरीच्या काळात केंद्र शासनाने परदेशातुन आयात केलेला कांदा महानगरांमध्ये दाखल झाल्याने देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कांदा उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पुर्ण होऊन शिल्लक राहिलेला कांदा निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठेत रवाना झाल्यास कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहणेस मदत होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक