शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातबंदी उठविण्यासह साठवणूक मर्यादा रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 18:55 IST

लासलगाव : बाजार समिती सभापतींचा केंद्राशी पत्रव्यवहार

ठळक मुद्दे लवकरच येथील बाजार समित्यांमध्ये लेट खरीप (रांगडा) कांदाही मोठ्या प्रमाणावर विक्र ीस येणार आहे

लासलगांव : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत गेल्या १५ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरू असून अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादनात घट झाल्याने मिळणारे दर हे शेतकरी वर्गाला परवडत नसल्याने केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासह कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करावी, या करीता लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापदी सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचेसह राज्याचे मुख्यमंत्री उदद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून विनंती केली आहे.सद्यस्थितीत समितीच्या लासलगांव मुख्य बाजारासह निफाड व विंचुर उपबाजार आवारात दररोज साधारणत: ३० ते ३५ हजार क्विंटल अर्ली खरीप कांद्याची विक्र ी होत आहे. परंतु माहे सप्टेंबर २०१९ पासून संपुर्ण देशभरात कांदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर २०१९ चे अधिसूचनेनुसार भारतातून होणाऱ्या सर्व प्रकारच्या कांद्याचे निर्यातीस प्रतिबंध केला आहे. याशिवाय, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दि. ३ डिसेंबर २०१९ चे आदेशानुसार देशभरातील घाऊक व्यापाऱ्यांना 250 क्विंटलपर्यत (२५ मे. टन) व किरकोळ व्यापाºयांना ५० क्विंटलपर्यंत (५ मे. टन) कांदा साठवणुकीची मर्यादा लागू केल्याने येथील व्यापारी वर्गास त्यांच्या दैनंदीन कांदा खरेदीवर बंधन आलेले आहे. वास्तविक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत विक्र ीस येणा-या अर्ली खरीप कांद्याची टिकवण क्षमता ही कमी असल्याने येथील शेतक-यांना सदरचा कांदा शेतातून काढलेनंतर लगेच विक्र ी केल्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही. त्यामुळे येथील बाजार समित्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर सदरचा कांदा विक्र ीस येत आहे. लवकरच येथील बाजार समित्यांमध्ये लेट खरीप (रांगडा) कांदाही मोठ्या प्रमाणावर विक्र ीस येणार आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यांमधील स्थानिक कांदाही बाजारात दाखल झाला असून मध्यंतरीच्या काळात केंद्र शासनाने परदेशातुन आयात केलेला कांदा महानगरांमध्ये दाखल झाल्याने देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कांदा उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पुर्ण होऊन शिल्लक राहिलेला कांदा निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठेत रवाना झाल्यास कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहणेस मदत होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक