यंत्रमागासाठी वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी
By Admin | Updated: November 17, 2015 23:07 IST2015-11-17T23:06:39+5:302015-11-17T23:07:48+5:30
यंत्रमागासाठी वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी

यंत्रमागासाठी वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी
आझादनगर : राज्यातील यंत्रमागधारक दोन वर्षांपासून मंदीच्या सावटाखाली मार्गक्रमण करीत असून, शासनाने वीज दरात सवलत देण्याचे जाहीर करूनही आॅक्टोबर महिन्याच्या वीज देयकात चार रुपये २२ पैसे प्रमाणे दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करण्यात येऊन सर्वसमान वीजदर दोन रुपये ६६ पैसे असे कायम ठेवावे, अशी मागणी मालेगाव मध्यचे आमदार आसीफ शेख यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
यंत्रमाग कारखान्यासाठी लागणारी वीज ही २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्ती अशी दोन विभागणीत वीज दर आकारणी करण्यात येत होती. ही तफावत दूर करून सर्वांना समान वीजदर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी यंत्रमाग व्यवसाय असलेल्या मतदारसंघाच्या आमदारांनी राज्य शासनाकडे लावून धरली होती. त्यानुसार एकीकडे ७ नोव्हेंबर २०१५ रोजी सर्वांना समान वीजदर करण्यात आला; तर दुसरीकडे आघाडी शासनाच्या काळापासून (१ आॅगस्ट २०१२) इंधन समायोजन आकारणीत दिली जाणारी ५० टक्के सवलत रद्द करण्यात आली. यामुळे यंत्रमागधारकांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे.
राज्यातील यंत्रमाग व्यवसाय सततच्या मंदीमुळे डबघाईत
आला असून, राज्य शासनाने
केलेली ही वीज दरवाढ रद्द करून सर्वांना समान बेसिक दर आकारावे, अशी मागणी निवेदनाद्वारे
करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक शेख रफीक शेख बशारत उपस्थित होते. (वार्ताहर)