शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

देवळालीकरांना संसरीत अंत्यसंस्काराला ग्रामस्थांचा नकार

By श्याम बागुल | Updated: September 9, 2018 16:44 IST

देवळाली कँम्पच्या नागरीकांंच्या अंत्यविधीसाठी संसरीगावच्या दारणातीरी असलेल्या स्मशानभूमी जवळ पडते. त्यामुळे देवळालीच्या नागरिकांसाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्याऐवजी संसरी गावालगत स्मशानभूमीचा वापर केला जातो

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा ठराव : मृत्युचा दाखला, लाकडे न देण्याचा निर्णय रस्ताने परततांना विधीच्या राहिलेल्या वस्तु व साहित्य संबंधितांकडून टाकून दिले जाते.

नाशिक : देवळाली कँम्प परिसरातील नागरिकांना दारणातिरी संसरी गावातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार न करू देण्याचा ठराव संसरी ग्रामपंचायतीने केला असून, त्यामुळे आगामी काळात कॅम्पवासियांना मरणोत्तर विधीसाठी खडतर मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.देवळाली कँम्पच्या नागरीकांंच्या अंत्यविधीसाठी संसरीगावच्या दारणातीरी असलेल्या स्मशानभूमी जवळ पडते. त्यामुळे देवळालीच्या नागरिकांसाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्याऐवजी संसरी गावालगत स्मशानभूमीचा वापर केला जातो. उत्तर विधीनंतर संसरीच्या स्मशानभूमीची स्वच्छता न करतात रस्ताने परततांना विधीच्या राहिलेल्या वस्तु व साहित्य संबंधितांकडून टाकून दिले जाते. या संदर्भात संसरी ग्रामपंचायतीने चार वर्षांपासून कँन्टोमेंन्ट प्रशासनाशी पत्रव्यवहार करून त्यांचे लक्ष वेधले व संसरीच्या स्मशानभुमीचा देवळाली वासियांकडून होत असलेल्या वापरामुळे तिची स्वच्छता व देखभाल केली जावी अशी मागणी केली. परंतु कॅन्टोंमेट प्रशासनाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याने या पुढे देवलालीच्या नागरीकाना गावात अंत्यविधी करण्यास ग्रामस्थांनी विरोध करत कँन्टोमेंन्ट प्रशासनाने बांंधलेली स्मशानभूमीचा वापर करावा असा ठराव केला. संसरी गावात स्मशानभूमीत देवळालीवासियांना अंतिम संस्कार करता येणार नसून, केल्यानंतर ग्रामपंचायतीकडून मृत्युचा दाखलाच न देण्याचाही उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. शिवाय यापुढे अंत्यविधीसाठी लाकडे किंवा मृत्यु दाखला ग्रामपंचायतीच्या वतीने न देण्याचेही ठरविण्यात आले आहे.........................................................................चौकट===कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांकडून स्मशानभुमीची पाहणीसंसरी ग्रामपंचायतीने स्मशानभुमीचा वापर करू देण्यास नकार दिल्याने कॅन्टोंमेंटच्या नगरसेवकांसह लष्करी पदाधिकारींंनी स्मशानभुमीची पाहणी केली. जुन्या स्टेशन जवळील रेल्वे केबिन जवळील पुला खालून रस्ता तयार करून नवीन स्टेशनवाडी भागातून कॅन्टोन्मेंट नदी किनारी नवीन स्मशान भूमी उभारली जाऊ शकते का याबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वेच्या परवानगीने या मार्गावरून मोठी वाहने देखील जाऊ शकतात ही बाब अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याबाबत सर्व अहवाल तयार करून बोर्डाच्या आगामी बैठकीत ठेवण्याचे व त्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडियर पी.रमेश, उपाध्यक्ष मीना करंजकर, नगरसेवक दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार,अभियंता विलास पाटील,माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर,राजू ठाकूर उपस्थित होते.

 

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक