शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

...तर राष्टÑवादाची व्याख्या चुकीची ठरते : सुभाष वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:30 AM

पुरोगामी विचार बाजूला करून केवळ सनातनी विचारधारेतून या देशात राष्टÑवादाची व्याख्या केली जात असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल.

नाशिक : पुरोगामी विचार बाजूला करून केवळ सनातनी विचारधारेतून या देशात राष्टÑवादाची व्याख्या केली जात असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल. देशात जेव्हा शेतकरी, शेतमजुरांसारखे घटक कष्ट उपसतात तेव्हा राष्टवाद सिद्ध होतो, असे प्रतिपादन समाजवादी अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांनी  केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ६३वे पुष्प वारे यांनी ‘संवैधानिक राष्टÑवाद’ या विषयावर बुधवारी (दि.२०) गुंफले. औरंगाबादकर सभागृहात बोलताना ते यावेळी म्हणाले, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्टÑामध्ये ‘राष्टÑवाद’ या शब्दाचा वापर चिथावणीसाठी होत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या पक्षाला जनतेने प्रचंड बहुमत मिळवून दिले. त्या सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीला सामोरे जाताना विकासाचा कोणताही मुद्दा नसावा, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असू शकेल? असा प्रश्नही वारे यांनी यावेळी उपस्थित केला.देशाच्या सीमांचे रक्षणासाठी सैन्यदल सक्षम असून राजकीय व्यवस्थेपासून ते लांब राहून आपले कर्तव्य बजावत आहेत; मात्र त्यांच्या धाडसी आणि शौर्यपूर्ण कामगिरीचेही भांडवल सत्ताधाऱ्यांकडून केले जाणे ही लाजिरवाणी बाब आहे. अन्नधान्याच्या बाबतीत भारत देश स्वयंपूर्ण आहे, तो केवळ शेतकरी अन् शेतमजुरांच्या जिवावर. मात्र या शेतकºयाला आज कोणते दिवस सत्ताधाऱ्यांनी बघायला लावले, ते वेगळे सांगायला नको, असेही वारे म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक