कांद्याला हमीभाव द्या संसदेत हरिश्चंद्र चव्हाणांची मागणी
By Admin | Updated: July 10, 2014 01:06 IST2014-07-09T22:08:00+5:302014-07-10T01:06:57+5:30
कांद्याला हमीभाव द्या संसदेत हरिश्चंद्र चव्हाणांची मागणी

कांद्याला हमीभाव द्या संसदेत हरिश्चंद्र चव्हाणांची मागणी
नाशिक : कांद्याला जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत यादीतून वगळण्याबरोबरच कांद्याला हमीभाव दिला तरच शेतकरी टिकेल, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्त्येशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे कांद्याला तत्काळ हमीभाव द्यावा, अशी मागणी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली. लोकसभेच्या शून्य प्रहरात कांद्याच्या एकूणच परिस्थितीसंदर्भात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लेखी प्रश्न उपस्थित केला होता. कांदा न खाताही मनुष्य जगू शकतो म्हणून कांदा जीवनावश्यक वस्तू नाही. कांद्याची आयुर्मर्यादा खूप कमी असते व तो लवकर नाश पावतो. कांद्याला फार दिवस साठवून ठेवता येत नाही. म्हणून हा इतर शेती उत्पन्नापासून वेगळा आहे. कांद्याचे भाव कडाडले असले, तरी ते कमी करण्यासाठी कांद्याला जीवनावश्यक वस्तूंत समावेश करून किंवा त्याचे निर्यातमूल्य वाढवून ते कमी होणार नाहीत, तर त्यासाठी उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे, तसेच कृषिमंत्र्यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)