शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नक्षलवाद पसरवताना आदिवासींची बदनामी : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 01:00 IST

अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी सुरू केलेला लढा अविरत सुरू राहणार असून, सत्याची कास धरून आदिवासी बांधवांच्या न्याय्य-हक्कांसाठी देशपातळीवर लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथे आयोजित सोहळ्यात केले.

ठळक मुद्देराघोजी भांगरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपजून

घोटी : अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी सुरू केलेला लढा अविरत सुरू राहणार असून, सत्याची कास धरून आदिवासी बांधवांच्या न्याय्य-हक्कांसाठी देशपातळीवर लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथे आयोजित सोहळ्यात केले.

 

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, तसेच धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवारी (दि. १४) वासाळीत उभारण्यात येणाऱ्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सोनोशी येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, वनराज्यमंत्री दत्तामामा भरणे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, आमदार किरण लहामटे, सुनील भुसारा, आमदार नितीन पवार आदी उपस्थित होते. पवार यांनी सांगितले की, राजकीय हेतूने कार्य न करता आदिवासी समाजाच्या न्याय्य- हक्कांसाठी हा राष्ट्रव्यापी लढा उभारला गेला आहे. आदिवासी बांधव हे पिढ्यानपिढ्या देशाचे मूळ मालक आहेत. जल, जमीन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम आदिवासी बांधवांकडून केले जात आहे. आदिवासी समाजातील इतर घटक यांच्यात अंतर ठेवण्याचे कुठलेही कारण नाही. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी जे योगदान स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिले, त्याचे स्मरण व जतन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत वर्तमान व पुढच्या पिढीसाठी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ९ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिन शासकीय पातळीवरही आदिवासी दिन म्हणून पाळला जावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले, तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आदिवासी बांधवांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे सांगितले. स्वागताध्यक्ष सतीश पेंदाम यांनी राघोजी भांगरे यांच्या बलिदानाची गाथा मांडली. दरम्यान, बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यव्यापी सांस्कृतिक महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले होते. या वेळी विविध ठिकाणावरून आलेल्या कला पथकांनी आपली पारंपरिक कला सादर केली.

इन्फो

साहित्य संमेलनात घडणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळताना क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचेही योगदान अविस्मरणीय व अतुलनीय असे आहे. राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या रुपाने स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहील. नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन लावण्यात येऊन जगभरातून येणाऱ्या नागरिकांना येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन करून देण्यात येईल. तसेच कळसूबाई शिखरावर रोप-वेच्या माध्यमातून आदिवासी भागातील पर्यटनालाही चालना देण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSharad Pawarशरद पवारnaxaliteनक्षलवादी