शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बाळंतवेदनांतून "तिने" केली हरिणीची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 00:15 IST

नगरसूल : येवला तालुक्यातील कोळगाव-ममदापूर शिवाराजवळील तरुळी भागात शेताजवळ गर्भवती असलेल्या हरिणीच्या बाळंतवेदना पाहून मदतीला धावलेल्या एका महिलेने त्यातून तिची सुखरूप सुटका केली; परंतु हरिणीच्या पाडसाचा जीव मात्र वाचवण्यात यश आले नाही.

ठळक मुद्देमातेच्या वेदना मातेलाच उमगल्या : पाडसाचा मात्र मृत्यू

नगरसूल : येवला तालुक्यातील कोळगाव-ममदापूर शिवाराजवळील तरुळी भागात शेताजवळ गर्भवती असलेल्या हरिणीच्या बाळंतवेदना पाहून मदतीला धावलेल्या एका महिलेने त्यातून तिची सुखरूप सुटका केली; परंतु हरिणीच्या पाडसाचा जीव मात्र वाचवण्यात यश आले नाही.शेतकरी रमेश शिंदे, त्यांची पत्नी कल्पना, मुलगा अविनाश हे शेतात काम करीत असताना शेताच्या मागील बाजूस काही अंतरावर एक हरिण दिसले. त्या भागात हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शिंदे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु कल्पना शिंदे यांना सदर हरणाची काही तरी अडचण असल्याचे लक्षात आले व त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता सदर मादी हरिण गर्भवती असल्याने तिला उठता येत नसल्याचे लक्षात आले. कल्पना शिंदे यांनी तिची तडफड पाहून पती व मुलाला मदतीला बोलावले व तिचे अर्धवट अडकलेले पाडस बाहेर काढले. हरिणीचे प्राण वाचले. मात्र, पाडसाने प्राण सोडला. यावेळी हरिणी वेदनेने विव्हळत होती. दरम्यान, वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना सदर घटनेची माहिती भाऊलाल कुडके यांनी दिल्यानंतर काही वेळातच वनविभागाचे कर्मचारी वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती पाहून मृत पाडस जवळच खड्ड्यात पुरले व हरिणीला येवला येथे वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब होन यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यावेळी डॉ. होन यांनी तात्काळ औषधोपचार केल्याने हरिणीचा जीव वाचला.सदर हरिण सुमारे दीड ते दोन तास अर्धवट अवस्थेत पाडस अडकल्याने मृत्यूशी झुंज देत होती; परंतु कल्पना शिंदे यांनी हिंमत दाखवत केलेल्या मदतीमुळे हरिणीचे प्राण वाचले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्पना यांच्यासह या शेतकरी कुटुंबाचे कौतुक केले.अशा घटना घडतात; पण त्याकडे काही लोक कानाडोळा करतात. शिंदे यांच्या सारख्या लोकांनी प्रसंगावधान राखून घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखल घेतली. हरिण अडलेल्या अवस्थेत पाहून दोन जीव मृत्यूशी झुंज देत असताना शिंदे यांनी धाडस करत हरिणीला जीवदान दिले. दोन दिवस औषधोपचार करून या हरिणीला राजपूत वनसंवर्धन क्षेत्रात सोडण्यात येणार आहे.- ज्ञानेश्वर वाघ, वनरक्षक, राजापूर. 

टॅग्स :forestजंगलSocialसामाजिक