शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वीजनिर्मितीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:16 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाउन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवावगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत अभूतपूर्व घट झाली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढून २० हजार मेगावॉटपर्यंत जाते, मात्र सध्या विजेची मागणी १३ हजार मेगावॉटपर्यंत आलेली आहे. ती अजूनही घटण्याची शक्यता आहे. अर्थात, लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय तर बंद झालेच; परंतु राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाल्यानेदेखील घरगुती विजेची मागणीही कमी झाली आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : लॉकडाउनबरोबरच अवकाळी पावसाचाही परिणाम

शरदचंद्र खैरनार।एकलहरे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाउन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवावगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत अभूतपूर्व घट झाली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढून २० हजार मेगावॉटपर्यंत जाते, मात्र सध्या विजेची मागणी १३ हजार मेगावॉटपर्यंत आलेली आहे. ती अजूनही घटण्याची शक्यता आहे. अर्थात, लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय तर बंद झालेच; परंतु राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाल्यानेदेखील घरगुती विजेची मागणीही कमी झाली आहे.सद्यस्थितीत महानिर्मितीचे नाशिक, परळी, भुसावळ व खापरखेडा येथील २१० मेगावॉटचे संच विजेच्या मागणीअभावी बंद ठेवण्यात आले आहेत. इतर ठिकाणची वीज निर्मिती कमी- अधिक प्रमाणात सुरू आहे. एकलहरे येथील प्रत्येकी २१० मेगावॉटच्या तीन संचांपैकी एकाचा कोळसा खासगी कंपनीस दिला आहे. एक संच स्टँडबाय असून, एका संचातून १५० मेगावॉटच्या जवळपास वीज उत्पादन दोन दिवसांपूर्वी सुरू होते. मात्र महावितरणची मागणी घटल्याने तो संचही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागणी वाढल्यावर संच त्वरित सुरू करण्यात येईल, असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी लोकमतला सांगितले.गरज भासलीच तर हा तुटवडा केंद्र शासनाच्या वाट्यातून म्हणजेच सेंटर ग्रीडमधून मिळणाऱ्या विजेतून भागवलो जातो, परंत तूर्तास विजेची मागणी घटली आहे.राज्याची मागणी १५ हजार ७४३ मेगावॉटदिनांक २६ मार्चच्या सायंकाळी ५ वाजेच्या आकडेवारीनुसार कोल, गॅस, हायड्रो व सोलर मिळून महाजेनकोची वीजनिर्मिती ५ हजार ४२३ मेगावॉट आहे. तर खासगी क्षेत्रातील विविध कंपन्यांची तसेच इतरांची एकूण ४ हजार १३३ मेगावॉट वीजनिर्मिती अशी एकूण (मुंबईवगळता) ९ हजार ५५६ मेगावॉट वीज राज्यात उपलब्ध होत आहे. महानिर्मितीसह खासगी व इतर स्रोतांची मिळून १० हजार ७२६ मेगावॉट वीज आहे. त्या तुलनेत राज्याची मागणी १५ हजार ७४३ मेगावॉट आहे. राज्याची मागणी लक्षात घेता सुमारे पाच हजार मेगावॉट विजेचा तुटवडा भासतो.वीजनिर्मितीची स्थितीएकलहरे (नाशिक)- क्षमता ६३० मेगावॉट, वीजनिर्मिती- शून्यकोराडी- क्षमता २४०० मेगावॉट, वीजनिर्मिती- १२७२खापरखेडा- क्षमता १३४० मेगावॉट, निर्मिती ४७६,पारस- क्षमता ५०० मेगावॉट, निर्मिती- ४६१,परळी- क्षमता ११७० मेगावॉट, निर्मिती- शून्य,चंद्रपूर- क्षमता २९२० मेगावॉट, निर्मिती- १६००,भुसावळ- क्षमता १२१९ मेगावॉट, निर्मिती- शून्य,उरण गॅस टर्बाईन- क्षमता ४३२ मेगावॉॅट, निर्मिती- २५५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरण