शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नाशिकमध्ये तलावात विसर्जनाला नकार

By श्याम बागुल | Updated: September 13, 2018 17:55 IST

गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे

ठळक मुद्देप्रदूषण टळेल : अनुचित घटनांना आळा बसेलभाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नाशिक : गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावातील पाणी दूषित होण्याबरोबरच गत काही अनुचित घटनांचा विचार करता यंदाही विल्होळीच्या तलावात गणेश विसर्जन न करण्याचा व करू देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.येथील हनुमान मंदिर येथे विल्होळी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली. गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे मागे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दोन ते तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सदर तलावातील गाळ, मुरूम काढण्यात आलेल्या असून, तलावामध्ये ओबडधोबड स्वरूपाचे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तलावातील पाण्यामुळे या खड्ड्यांचा व खोलीचा अंदाज येत नाही. तसेच विसर्जन काळात मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने विल्होळी तलावात विसर्जन बंदी कायम ठेवण्यावर ग्रामस्थांचे एकमत झाले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत मोहिते यांनी गावकºयांना मार्गदर्शन केले. महामार्गावर असलेले विल्होळी गाव संवेदनशील असल्याचे समजले होते. परंतु गावातील एकोपा पाहिल्यावर कायदा व सुव्यवस्था राखणारे गाव असल्याचे जाणवले. गावात एकोपा नांदून गुन्हे कमी कसे होतील यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. तालुका पोलीस ठाण्यापासून विल्होळी गाव दूर असले तरी, ग्रामस्थांनी अडचणीच्या काळात भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा त्यांना प्रतिसाद दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी विल्होळी सरपंच बाजीराव गायकवाड, उपसरपंच श्री कृष्ण मते, सदस्य सोमनाथ भावनाथ, माजी पंचायत समिती उपसभापती सुजाता रूपवते, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष देवरे, पोलीसपाटील संजय चव्हाण, मनोहर भावनाथ, मोतीराम भावनाथ उपस्थित होते.

 

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिक