शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:03 IST

लासलगाव : केंद्र सरकारने सोमवारी कांदा निर्यातबंदीचा घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उमटले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले आहे.

ठळक मुद्देकांदा निर्यातबंदी : केंद्र सरकारने निर्णय रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी

शेखर देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : केंद्र सरकारने सोमवारी कांदा निर्यातबंदीचा घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उमटले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले आहे.गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतात पाऊस सुरू असल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली. मोठ्या शहरात प्रथमक्र मांकाच्या कांद्याला मागणी वाढली आहे. एप्रिलपासून दरात घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र तो सडण्यास सुरुवात झाल्याने शेतकºयांनी दोन हजार रुपयांच्या आत विक्री केला. बाजारात अपवादात्मक वाहनातील प्रथम क्र मांकाचा कांदा विक्रीला आला तर सौदे पूर्ण करण्यासाठी व्यापारी महाग बोली लावू लागले; परंतु बाजारपेठेत कांदा महागल्याचे कृत्रिम चित्र रंगवले गेले. १९८८ साली बिहारच्या सत्ताधाºयांना कांदाप्रश्नामुळे सत्ता गमवावी लागली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून निर्यातमूल्यवाढीचे धोरण न अवलंबिता थेट कांदा निर्यातबंदीचा प्रयोग केंद्र शासनाने केला आहे. दर वाढल्यानंतर देशभरात कांदा रास्त दरात देता यावा याकरिता नाफेडमार्फेत सुमारे पन्नास हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय सुरू आहे. परंतु मागील वर्षीही स्थिराकरण निधीतून खरेदी केलेला कांदा चाळीत सडला. जर नाफेडने तंत्रज्ञान वापरून साठवलेला कांदा सडतो तर तेच नुकसान कांदा उत्पादकांच्या घरोघरी होते. ते कोण भरून देणार, असा सवाल शेतकºयांनी केला आहे.केंद्र शासन कांदा आयात करणे यासारखे निर्णय घेताना शेतकºयांच्या मानसिकतेचा किंवा नुकसानीचा विचार करत नाही.कांदा उत्पादकांच्या रोषात वाढपुढील महिन्यात येणाºया नवीन कांद्याच्या उत्पादनात ३० टक्क्यांनी घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचवेळी आॅक्टोबरमध्ये नवीन कांदा येणाºया राजस्थानमधील लागवडीला महिनाभर उशीर झाला. याचा एकूण परिणाम कांदा दरवाढीवर झाला आहे. निर्यातबंदी न करता जर कांद्याला प्रतिक्विंटल दोन त तीन हजार रुपये अनुदान न दिल्याने कांदा उत्पादकांच्या रोषात वाढ झाली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा