शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
6
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
7
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
8
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
9
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
10
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
11
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
12
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
13
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
14
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
15
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
16
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
17
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
18
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
19
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
20
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

महिनाभरात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’बाबत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 01:53 IST

इकोसेन्सेटिव्ह झोनबाबत वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यंदा गांभीर्याने कामकाज झाले असल्याचे दिसते. या दोन्ही विभागांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केल्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यातच ‘इको सेन्सेटिव्ह झोन’संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असा विश्वास जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. निसर्ग आणि नदीच्या संवर्धनाची संकल्पना निश्चित करणेदेखील अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देराजेंद्र सिंह यांना विश्वास : निसर्ग आणि नद्यांच्या संवर्धबाबात बैठक

नाशिक : इकोसेन्सेटिव्ह झोनबाबत वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यंदा गांभीर्याने कामकाज झाले असल्याचे दिसते. या दोन्ही विभागांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केल्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यातच ‘इको सेन्सेटिव्ह झोन’संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असा विश्वास जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. निसर्ग आणि नदीच्या संवर्धनाची संकल्पना निश्चित करणेदेखील अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलतज्ञ्ज राजेंद्र सिंह यांनी ब्रह्मगिरी इको सेन्सेटिव्ह झोनबाबत आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, ब्रह्मगिरी बचाव कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी सिंह यांनी ब्रह्मगिरीसह परिसरातील पर्यावरण रक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण असलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनबाबत माहिती घेतली असता त्यांनी जिल्ह्याच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत येत्या दीड-दोन महिन्यांत इको सेन्सेटिव्ह झोनला अंतिम स्वरूप येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. ब्रह्मगिरीसह ५५ पर्वतांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये लागू असलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनबाबत यावेळी गांभीर्याने काम झाले असल्याने साधारणत: महिनाभरात इको सेन्सेटिव्हचे आदेश येऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुळात या कामाला उशीर झाला असल्याचे मान्य असले तरी आता येथून पुढे जे काही चांगले होणार आहे ते महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्ग संवर्धन आणि प्रदूषणमुक्त नदी होण्यासाठीचे प्रयत्न होण्यासाठी नियोजनात्मक कामाची आवश्यकता आहे. गोदावरी बारमाही वाहण्यासाठी मुळात ब्रह्मगिरीचे संरक्षण झाले पाहिजे. गोदाकाठी होणाऱ्या दगडी कामाबाबत त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.

--इन्फो--

रोपवेचा मुद्याही चर्चेत

यावेळी झालेल्या बैठकीत ब्रह्मगिरी कृती समितीच्या वतीने राजेंद्र सिंह यांना नियोजित रोपवेच्या उपक्रमाविषयीची माहिती दिली. यावेळी प्रशासनाने आता केवळ प्रस्ताव असल्याचे सांगितले असता पर्यावरणप्रेमींनी त्यास हरकत घेत अंजनेरी येथे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असल्याने येथे असा प्रयोग करणे चुकीचे ठरेल असे मुद्दे उपस्थित केले.

--इन्फो--

हरियाली और निर्मलता

ब्रह्मगिरीची हरियाली आणि गोदावरीची निर्मलता राखणे ही सर्वांची जबाबदारी असून, त्यादृष्टीने आपले कामकाज झाले पाहिजे, असे सांगताना सिंह यांनी पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाचा होणार ऱ्हास थांबविला पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली. गोदावरी बारमाही वाहण्यासाठी ब्रह्मगिरीचे संरक्षण झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान