शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जिल्ह्यातील निर्बंधाबाबत आज निर्णय शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:16 AM

नाशिक: जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता मिळावी, या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या टास्क फेार्समध्ये निर्णय होण्याची ...

नाशिक: जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता मिळावी, या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या टास्क फेार्समध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पुढील सोमवारपासून नाशिककरांना दिलासा मिळणार की निर्बंध कायम राहणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

गेल्या २३ तारखेला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या काेरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबतची चर्चा झाली होती. निर्बंधात शिथिलता मिळावी, अशी मागणी अनेक व्यापारी संघटनांसह व्यावसायिकांकडून होत असल्याने, त्यांच्या मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली होती. यावेळी राज्य शासनाकडे शिथिलतेबाबत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याने, शनिवार किंवा रविवार यापैकी एक दिवस दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी किंवा दुकानांची वेळ एक तासाने वाढवून तरी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या टास्क फोर्सकडे पाठविला आहे. या पथकाची गुरुवारी मुंबईत बैठक होणार असून, शिथिलता देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली, तर पुढील सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे.

सध्या जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन असल्याने, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दुकाने बंद ठेवली जातात. या दोन्हीपैकी एक दिवस दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी किंवा बाजारपेठेतील दुकानांची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत तरी वाढवून द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधात शिथिलता देण्याचा अधिकार हा केवळ मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सला असल्याने, त्यांच्या निर्णयावरच सर्वकाही अवलंबून असणार.

--इन्फो--

एखादा तास दिलासा शक्य

वीकेंड लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने, जिल्ह्यातील वीकेंड लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता आहे, परंतु काहीशी शिथिलता देण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सायंकाळी ४ ऐवजी ५ वाजेपर्यंत होऊ शकते. टास्क फोर्स नेमका काय निर्णय घेणार, यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.