शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गुरुवारी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ; दुपारपर्यंत निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 17:15 IST

अत्यंत चुरशीच्या व काही मतदारसंघांत अती-तटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. एकूण ४५ लाख ४४ हजार ६४१ मतदारांपैकी २८ लाख १७ हजार ९९७ मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यात सरासरी ६२.१ टक्के मतदानाची नोंद

ठळक मुद्दे पहिली फेरी जाहीर करण्यासाठी ४० मिनिटे लागतीलमतमोजणीची तयारी पूर्ण : विजयी मिरवणुकांवर निर्बंध

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी करीत असलेल्या १४८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून, सकाळी आठ वाजेपासून सर्वच मतदारसंघांमध्ये मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी बारा वाजेनंतर निकाल हाती येण्यास सुरुवात होणार असले तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवर पोलिसांनी निर्बंध लादले आहेत.

अत्यंत चुरशीच्या व काही मतदारसंघांत अती-तटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. एकूण ४५ लाख ४४ हजार ६४१ मतदारांपैकी २८ लाख १७ हजार ९९७ मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यात सरासरी ६२.१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच राजकीय पक्षांनीही निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केले होते. तरीदेखील २०१४च्या तुलनेत दोन टक्क्याने मतदान घटले. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे २००९ प्रमाणेच यंदा कॉँग्रेस आघाडी व महायुती अशी सरळसरळ लढत झाली. काही मतदारसंघांमध्ये महाराष्टÑ नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडीबरोबरच काही अपक्षांनीही निवडणुकीत रंगत आणली होती. त्यामुळे कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी व बहुरंगी लढती झाल्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळाली. त्याचबरोबर निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले होते. सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रात्रीचा दिवस करून प्रचारात स्वत:ला झोकून देत मतदानानंतर आपणच विजयी होऊ, असा दावा केला असला तरी त्याचा फैसला गुरुवारी होणार आहे.गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीस सुरुवात करण्यात येणार असून, प्रारंभी निवडणुकीच्या कामात नेमलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केलेल्या टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. त्यानंतर निवडणूक निरीक्षक व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष स्ट्रॉँगरूमचे सील काढण्यात येऊन मतपेट्या मोजणीसाठी प्रत्येक टेबलावर देण्यात येईल. साधारणत: पहिली फेरी जाहीर करण्यासाठी ४० मिनिटे लागतील, त्यानंतर मात्र प्रत्येक फेरीसाठी २० मिनिटे लागतील. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच उमेदवारांचा कल जाहीर होणार असून, आघाडी, पिछाडी पाहून उमेदवार दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यास मोकळे होतील.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक