शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 1:01 AM

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जिल्ह्णात आजपर्यंत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जिल्ह्णात आजपर्यंत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील मºहळ बु. येथील संतोष कारभारी शेळके (४२) या शेतकºयाने त्याच्या भावाच्या गट नंबर ३५ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. कर्जाला कंटाळून या शेतकºयाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. मºहळ बुद्रुक - सुरेगाव रस्त्यावरील शेळके वस्तीवर सदरचा प्रकार घडला. शेळके यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केली. शेळके यांनी शेतीसाठी विकास सोसायटीचे ७५००० रु पयाचे कर्ज घेतलेले होते. त्याच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले व आई असा परिवार आहे. वावी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. सदगीर करत आहे. अशीच घटना मालेगाव तालुक्यातील नरडाणे येथे घडली. बाजीराव त्र्यंबक भामरे (६०) या वयोवृद्ध शेतकºयाने विष प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून शेतकºयांच्या आत्महत्येच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या. राज्य सरकारने शेतकºयांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. सरकारच्या या मदतीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या रोखल्या जातील असे वाटत असताना चालू वर्षीदेखील जानेवारी महिन्यापासून शेतकºयांच्या आत्महत्या कायम आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांची दखल घेण्यात आली असून, महसूल व पोलीस खाते घटनेचे कारण शोधत आहे.