दुगावच्या तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: May 6, 2016 00:11 IST2016-05-05T23:48:44+5:302016-05-06T00:11:53+5:30
चांदवड तालुक्यात पाणीटंचाईचा बळी

दुगावच्या तरुणाचा मृत्यू
दुगाव : येथे वीज मोटारीच्या साहाय्याने पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून संजय अशोक पवार (३३) या तरुणाचा मृत्यू झाला. पंधरा दिवसांनंतर नळाला पाणी आले होते. कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने पाणी भरत असताना ही दुर्घटना घडली. तालुक्यात पाणीटंचाईचा बळी गेल्याची चर्चा होत आहे. त्यांंच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. संजय हा एकुलता एक मुलगा असल्याने वृद्ध आई - वडिलांचा आधार गेला आहे. परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)