शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पोलीस भरतीदरम्यान दिंडोरीच्या युवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 14, 2014 01:18 IST

दिंडोरी : मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील विशाल केदार या युवकाचा भरतीच्या धावण्याच्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवी अंत झाला.

दिंडोरी (जि. नाशिक) : मोलमजुरी करून पदवीचे शिक्षण घेऊन माता-पित्यांंचा आधार बनण्यासाठी मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील विशाल केदार (२४) या युवकाचा भरतीच्या धावण्याच्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवी अंत झाला. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील विशाल सुरेश केदार, गणेश सदाशिव दरगोडे, लक्ष्मण अंबादास गवळी हे तीन युवक मुंबई विक्रोळी (पूर्व) येथे गेले होते. मंगळवारी त्यांच्या विविध चाचण्या झाल्या. त्यात हे तिघेही पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले. बुधवारी सकाळी ७ वाजता हजर होते मात्र त्यांना दुपारी बारा वाजता त्यांची चाचणी सुरु झाली. शेवटचा टप्पा दृष्टीक्षेपात असतानाच विशालला चक्कर आली. गणेशने त्याला सावरत आधार देत झाडाचे सावलीला बसविले. त्याचवेळी मागून धावत येत असलेल्या त्याचा दुसरा मित्र लक्ष्मण याने विशालला अत्यवस्थ पडलेला पाहून त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर विशालला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी विशालचे प्राणोत्क्रमण झाले.दरम्यान, इंदोरे ग्रामस्थ व विशालच्या नातेवाईकांनी दिंडोरी येथे प्रांत मुकेश भोगे व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. विशालचा मृत्यू पोलीस भरती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला असून केदार परिवारास शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेदिंडोरी तालुक्यातील इंदोरे या गावातील विशाल हा सुरेश केदार यांचा एकुलता एक मुलगा. अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे मोलमजुरी करीत विशालने आपले एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाच्या चरितार्थासाठी विशालला नोकरीची नितांत आवश्यकता होती. म्हणून विशाल तात्पुरत्या मानधनावर इंदोरे ग्रामपंचायतमध्ये लिपिक म्हणून काम करीत असे. आपल्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्याने आपण नोकरीचा शोध घेतल्याशिवाय पर्याय नाही. याहेतूने विशाल दोन दिवसापूर्वी मुबई येथे पोलीस भरतीसाठी गेला होता. त्याप्रसंगी त्याचा अंत झाला. घरातला कर्ता युवक अचानक गेल्याने केदार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.अधिवेशात औचित्याचा मुद्दाविशाल केदारच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या कुटुंबीयांस पाच लाख रु पयाची मदत करावी, अशी मागणी आमदार धनराज महाले यांच्याकडे करण्यात आली. अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महाले यांनी केदार कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सखोल चौकशी करून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)