शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पोलीस भरतीदरम्यान दिंडोरीच्या युवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 14, 2014 01:18 IST

दिंडोरी : मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील विशाल केदार या युवकाचा भरतीच्या धावण्याच्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवी अंत झाला.

दिंडोरी (जि. नाशिक) : मोलमजुरी करून पदवीचे शिक्षण घेऊन माता-पित्यांंचा आधार बनण्यासाठी मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील विशाल केदार (२४) या युवकाचा भरतीच्या धावण्याच्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवी अंत झाला. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील विशाल सुरेश केदार, गणेश सदाशिव दरगोडे, लक्ष्मण अंबादास गवळी हे तीन युवक मुंबई विक्रोळी (पूर्व) येथे गेले होते. मंगळवारी त्यांच्या विविध चाचण्या झाल्या. त्यात हे तिघेही पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले. बुधवारी सकाळी ७ वाजता हजर होते मात्र त्यांना दुपारी बारा वाजता त्यांची चाचणी सुरु झाली. शेवटचा टप्पा दृष्टीक्षेपात असतानाच विशालला चक्कर आली. गणेशने त्याला सावरत आधार देत झाडाचे सावलीला बसविले. त्याचवेळी मागून धावत येत असलेल्या त्याचा दुसरा मित्र लक्ष्मण याने विशालला अत्यवस्थ पडलेला पाहून त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर विशालला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी विशालचे प्राणोत्क्रमण झाले.दरम्यान, इंदोरे ग्रामस्थ व विशालच्या नातेवाईकांनी दिंडोरी येथे प्रांत मुकेश भोगे व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. विशालचा मृत्यू पोलीस भरती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला असून केदार परिवारास शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेदिंडोरी तालुक्यातील इंदोरे या गावातील विशाल हा सुरेश केदार यांचा एकुलता एक मुलगा. अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे मोलमजुरी करीत विशालने आपले एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाच्या चरितार्थासाठी विशालला नोकरीची नितांत आवश्यकता होती. म्हणून विशाल तात्पुरत्या मानधनावर इंदोरे ग्रामपंचायतमध्ये लिपिक म्हणून काम करीत असे. आपल्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्याने आपण नोकरीचा शोध घेतल्याशिवाय पर्याय नाही. याहेतूने विशाल दोन दिवसापूर्वी मुबई येथे पोलीस भरतीसाठी गेला होता. त्याप्रसंगी त्याचा अंत झाला. घरातला कर्ता युवक अचानक गेल्याने केदार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.अधिवेशात औचित्याचा मुद्दाविशाल केदारच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या कुटुंबीयांस पाच लाख रु पयाची मदत करावी, अशी मागणी आमदार धनराज महाले यांच्याकडे करण्यात आली. अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महाले यांनी केदार कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सखोल चौकशी करून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)