नळातून आला मृत मासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 00:17 IST2016-06-14T22:42:02+5:302016-06-15T00:17:13+5:30

सिडकोतील घटना : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

The dead fish came out of the tube | नळातून आला मृत मासा

नळातून आला मृत मासा

 सिडको : प्रभाग क्रमांक ४३ मधील स्वामी विवेकानंदनगर भागातील एका नागरिकाकडे चक्क नळातून मृत मासा बाहेर आला. गेल्या दोन दिवसांपासून या भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून, याबाबत नागरिकांनी नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके यांच्या लक्षात सदर बाब आणून दिली. मनपाच्या सिडको पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची अपेक्षा सिडकोवासीयांनी केली आहे.
सिडको प्रभाग क्रमांक ४३ मधील स्वामी विवेकानंदनगर भागासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून, आज एका नागरिकाच्या घरातील पिण्याच्या पाण्यात चक्क मृत मासाच आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडकोतील काही भागात ड्रेनेजमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सावतानगर भागात पाणीकपातीच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याबरोबरच गेल्या आठ दिवसांपासून सिडकोतील पंडितनगर, शिवपुरी चौक यांसह परिसरातही नागरिकांना ड्रेनेजमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक रत्नमाला राणे व भूषण राणे यांना सदर बाब सांगितली. राणे यांनी जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नागरिकांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, असे अधिकाऱ्यांना सांगितले.
आज पुन्हा सिडकोतील स्वामी विवेकानंद भागात नळावाटे मृत मासा आढळून आल्यानंतर याठिकाणी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संजय बच्छाव यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके व नागरिक उपस्थित होते. मनपाने येथील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणीही यावेळी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The dead fish came out of the tube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.