शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाथरे करांची पहाट होतेय हरीनामाच्या भक्तिमय मधुर स्वरांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 16:16 IST

पाथरे : पाथरे येथील मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपहाटेच्या शांत वातावरणात मंदिरांमध्ये काकड आरती चा मधुर सूर निनादत आहे.

पाथरे : पाथरे येथील मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.पाथरे येथील श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पहाटे काकड आरती परंपरा जोपासली जात आहे. कोरोना काळातही काकड आरती परंपरा जपली जात आहे.सॅनिटायझर, सामाजिक दुरी याचे यावेळी पालन केले जात आहे. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास यामुळे हा कालावधी वाढला आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यात पहाटे काकड आरती केली जाते. काकडा आरती म्हणजे एक महिन्या चालणारा हा उत्सव असतो. वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार महत्व आहे. पहाटेच्या शांत वातावरणात मंदिरांमध्ये काकड आरती चा मधुर सूर निनादत आहे. काकड आरती मध्ये ज्येष्ठ, तरुण, महिला, बालके यांचा समावेश दिसतो आहे. यामुळे संस्कारक्षम पिढी घडते आहे. काकडा आरतीत भूपाळी, भजने, भक्ती गीते, अभंग, गवळण यांनी ग्रामस्थांच्या दिनक्रमास सुरुवात होत आहे. टाळ,मृदुंग, शंख, तानपुरा, घंटानाद आणि झांजेच्या मधूर स्वराने पाथरे करांची पहाट उल्हासित होत आहे. कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हा काकडा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहतो. या काळात पहाटे देवाला जागवण्यासाठी मंदिरांमधून काकड आरती करण्याची पद्धत प्रचलित आहे. पहाटे काकडा पेटवून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. जय जय राम कृष्ण हरी, उठा उठा प्रभात झाली, उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा साधु संत साधा आपले हित, उठा सकळजन उठले नारायण, आम्ही गरीब गवळ्याच्या नारी, मुका झालो वाचा गेली, बहिरा झालो या जगी बहिरा झालो या सारखे अनेक भक्ती गीतांनी, भजनांनी पहाट साजरी होत आहे. सकाळी आरती व संध्याकाळी हरिपाठ, भजन, गवळण यामुळे तरुण, लहान बालके सुसंस्कारी होण्यास चालना मिळत आहे. काकड आरतीला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत निळोबा, संत मुक्ताई या संतांचे अभंग, भजनं म्हटले जातात. एका तालासुरात मंजुळ स्वरात आरती, पुष्पांजलि, प्रसाद गीत व इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर सर्वांना फराळ, चहा पाणी देऊन समारोप होत असतो. काकडा समाप्ती नंतर आळंदी येथे जाण्यासाठी पायी दिंडीचे सुद्धा आयोजन करण्यात येते परंतु याकोरोना काळात पायी दिंडी सोहळा होईल की नाही याची चिंता ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर दिसत आहे. काकड आरती सोहळ्यात दत्त भजनी, मंडळ श्रीराम भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ, शनेश्वर भजनी मंडळ, गहिनीनाथ महिला भजनी मंडळ आदी मंडळांनी सहभाग घेत आहे.

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासTempleमंदिर