शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 8:28 PM

देवगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबा पीक धोक्यात आले असून, बळीराजाच्या मागचे ग्रहण सुटता सुटेना अशीच काहीशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : उत्पादनावर परिणाम शक्य

अवकाळी पावसाने कंबर मोडलेला बळीराजा हिवाळ्यात काहीतरी साध्य होते का, यासाठी कष्ट करत असताना आता त्याही पिकांवर ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाने पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. आंब्याच्या झाडाला आलेला मोहर गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या ढगाळ हवामानामुळे पार कोलमडून गेला आहे. आत्ताच कुठे आंब्याला मोहर फुलायला सुरुवात झाली होती. आंब्याचा मोहर बाहेर पडतो न पडतो तोच ढगाळ हवामानामुळे मोहर गळून पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.नाशिक जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून हवामान बदलाने कहर केला असून, काही ठिकाणी ढगाळ तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नुकत्याच झाडाला उमललेल्या मोहराच्या अंकुरांना जोरदार फटका बसल्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या कालावधीत आंब्याच्या झाडांना मोहर फुलण्यास सुरुवात होते. मोहराला पोषक अशी थंडीचे वातावरण लाभल्यास मोहर भरगच्च येतो. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका जास्त असतो. परिणामी या महिन्यात आंबा चांगला फुलतो; परंतु ऐनवेळी फुलण्याच्या वेळेला हवामानात झालेल्या बदलामुळे मोहराचे नुकसान झाल्याने आंबा उत्पादन संकटात सापडले आहे. या वातावरणामुळे आंब्याला आलेला मोहर पावसामुळे गळायला सुरुवात झाली असून, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. यामुळे काही भागात आंब्याचा मोहर गळालेल्या अवस्थेत दिसत आहे, तर काही ठिकाणी काळपट पडला आहे. हापूस, केशरी, राजापुरी आदी प्रकारच्या आंब्यांच्या झाडांचा मोहर ढगाळ वातावरणामुळे गळून पडल्याने आंब्याच्या गोडव्याला घरघर लागली आहे. वातावरणीय बदलांमुळे गळून पडत असलेला आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMangoआंबा