शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

गंगापूर समूहातील धरणसाठा ९७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 1:29 AM

धरण क्षेत्रात बरसणाऱ्या श्रावणसरींमुळे गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने समूहातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागीलवर्षी समूहाचा धरणसाठा ९६ टक्के इतका होता. या चार प्रकल्पांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरीमधूनच किरकोळ पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

नाशिक : धरण क्षेत्रात बरसणाऱ्या श्रावणसरींमुळे गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने समूहातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागीलवर्षी समूहाचा धरणसाठा ९६ टक्के इतका होता. या चार प्रकल्पांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरीमधूनच किरकोळ पाण्याचा विसर्ग केला जात आहे.आॅगस्टमधील पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने दहा दिवस जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे २४ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे नद्यांना मोठा पूर आला होता. गंगापूर, दारणा, कडवा आणि नांदूरमधमेश्वरमधून तर विक्रमी पाण्याचा विसर्ग करावा लागला. सातत्याने विसर्ग सुरू असल्यामुळे पूरपरिस्थितीही मोठ्या प्रमाणात वाढली. याचा फटका गोदाकाठी असलेल्या गावांना चांगलाच बसला.आॅगस्टच्या पंधरवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असून, धरणक्षेत्र वगळता अन्य तालुक्यांमध्ये कुठेही पाऊस नाही. श्रावणसरीची बरसात काही ठिकाणी होत असली तरी धरण क्षेत्रातील पावसाचा जोर अधिक असल्याने धरणांच्या पातळीत वाढ झालेली आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दोन दिवसांत वाढ झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी ९३ टक्के असलेला धरणाचा साठा आता ९५.८ टक्के इतका झाला आहे. कश्यपी धरणातदेखील ९९ टक्के साठा असून, गौतमी गोदावरीत ९७ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे. समूहातील एकूण पाणीसाठा आता ९७ टक्क्यांवर पोहोचला असून, मागीलवर्षीच्या तुलनेत एका टक्क्याने पाणीसाठा अधिक आहे. सध्या गौतमी आणि आळंदीमधूनच किरकोळ स्वरूपात विसर्ग केला जात आहे.गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांतील पाणीसाठा चांगलाच वाढला असताना दुसरीकडे दारणा धरणही ९६ टक्के इतके भरले आहे.जिल्ह्यातील पाणीसाठा ९० टक्क्यांवरयंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणे भरभरून वाहिले असताना मागील वर्षीच्या पाणीसाठ्याचे उच्चांक मोडीत काढत यंदा पावसाने नाशिककरांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात २४ प्रकल्प असून, सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा १४ टक्क्यांनी अधिक आहे. धरणातील पाणीसाठ्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. मागीलवर्षी जिल्ह्याचा पाणीसाठा ७६ टक्के इतका होता. यंदा तो ९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणRainपाऊसWaterपाणी