शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दिंडोरी तालुक्यातील धरणे पाण्याविना उपासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:00 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत कमी पाऊस पडला. त्यामुळे परिणाम तालुक्यातील धरणावर होऊन पाण्याची पातळी घटली आहे.

ठळक मुद्देपाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी घटली

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत कमी पाऊस पडला. त्यामुळे परिणाम तालुक्यातील धरणावर होऊन पाण्याची पातळी घटली आहे.दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी या तालुक्यात पाऊस अव्वाच्या सव्वा पडल्याने तालुक्यातील सर्व धरणे १०० टक्के भरली होती. त्यामुळे आता तालुक्यावर पाणी टंचाईचे संकट येणार नाही. यामुळे या तालुक्यातील शेतकरी वर्ग आनंदीत झाला होता. या तालुक्यावर इतर तालुके पाण्यासाठी आतुरलेले असतात.कारण या तालुक्यातील धरणातील काही पाण्याचासाठा इतर तालुक्यासाठी राखीव स्वरु पचा ठेवलेला असतो. म्हणून दिंडोरी तालुक्याप्रमाणे इतर तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे संकट आले नाही. धरणातून इतर तालुक्याला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी रोटेशन पध्दतीने सोडण्याचे वार्षिक नियोजन हे अगोदरच शासन करीत असते.परंतु यंदा मात्र पावसाने दिंडोरी तालुक्यात आपला लहरी पणा दाखविल्यामुळे पाऊस पडण्याचे सरासरी प्रमाण मागीलवर्षी पेक्षा कमी आहे. त्यामुळे राखीव व रोटेशन पध्दतीचे पाणी तालुक्याला व इतर तालुक्यांना सोडल्यामुळे प्रत्येक धरणाची पाण्याची पातळी घटली आहे. आता जोरदार पाऊस होईल. व पुन्हा एकदा धरणातील पाण्याचा साठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.आहे.(फोटो ०३ दिंडोरी,०१ )

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरण