मंगल कार्यालयांचे कधीही भरून न येणार नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:16 PM2020-09-21T23:16:49+5:302020-09-22T01:01:24+5:30

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मंगल कार्यालय , लॉन्स या व्यवसायचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यावर अवलंबून असलेले आनेकांचा रोजगार बंद झाला आहे . या व्यवसायसाठी राज्य आणि केंद्र शासनाने विशेष पैकेज दिले तरच हा व्यवसाय भविष्यात तग धरु शकतो . असे मत या व्यवसाइकानी व्यक्त केले आहे.

The damage to Mars offices will never be compensated | मंगल कार्यालयांचे कधीही भरून न येणार नुकसान

मंगल कार्यालयांचे कधीही भरून न येणार नुकसान

Next
ठळक मुद्देअनेकांचा रोजगार बुडाला : उपस्थितिवर मर्यादा

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मंगल कार्यालय , लॉन्स या व्यवसायचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यावर अवलंबून असलेले आनेकांचा रोजगार बंद झाला आहे . या व्यवसायसाठी राज्य आणि केंद्र शासनाने विशेष पैकेज दिले तरच हा व्यवसाय भविष्यात तग धरु शकतो . असे मत या व्यवसाइकानी व्यक्त केले आहे .
एप्रिल , मे , जून हे तीन महीने मंगल कार्यलयाचा व्यावसाय सुरु असतो यावर्षी मार्च महिन्यापासुन लोकड़ाऊंन सुरु झाले आणि या व्यवसाइकांवर गडांतर आले . नाशिक शहरात साधारणत: एकूण 300 मंगल कार्यालय आहेत . लग्नाचा सीजन सुरु झाल्यानंतर दोन महिन्यात एका मंगल कार्यालयात कमीत कमी 50 ते 60 लग्न होतात . एका लग्नामगे मंगल कार्यालयास किमान एक लाख रु भाडे मिळते याचा धोबळ हिशोब केला तरी लॉकडाऊन मुळे या व्यवसायाचे किती मोठे नुकसान झाले आहे याचा अंदाज येतो . या व्यतिरिक्त बैंड , डेकोरेशन , घोड़ा , केटरिंग , यांचे झालेले नुकसान धरले तर नुकसानीचा आकड़ा टिप्टीने वाढतो अशी माहिती मंगल कार्यालय व्यवसायिक विक्रांत मते यांनी दिली .
शासनाने आता लग्नसाठी 100 लोकांच्या उपस्थितिला मान्यता दिली आहे . इतक्या कमी लोकांसाठी कुणी मंगल कार्यालय घेत नाही . छोटे हॉल किवा हॉटेल मध्ये लोक लग्न करू लागले आहेत मंगल कार्यालय घेण्याचे टाळले जाते . त्यामुळे आता मंगल कार्यालयानी छोटे पैकेज बनविन्यास सुरुवात केली आहे . असेही मते यांनी सांगितले .

लॉकडाउनमुळे मंगल कार्यालयांचा व्यावसाय शंभर टक्के बंद झाला आहे . संपूर्ण देशाचा विचार केला तर या व्यवसायाचे एक लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे . याशिवाय या व्यवस्यावर चळणाऱ्या सुमारे 50 एजेन्सी धोक्यात आल्या आहेत . इतकेच काय भांडी धूणाºया गोरगरीब महिलांचा रोजगार बंद झाला आहे . मंगल कार्याल्यावर आलेली ही आर्थिक महामारी असून केंद्र आणि राज्य शासनाने विशेष प्याकेज देऊन घरपट्टी , विजबिल यात सवलत द्यावी त्याच बरोबर बँकांचे हप्ते भरन्यासाठी मुदतवाढ द्यावी तरच हे व्यवसायिक तग धरु शकतील - उद्धव निमसे , मंगल कार्यालय संचालक , नाशिक

 

Web Title: The damage to Mars offices will never be compensated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.