शहरं
Join us  
Trending Stories
1
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
2
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
3
५० देशांच्या जीडीपीपेक्षा BMC ची तिजोरी मोठी; पाहा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे आर्थिक गणित
4
BCCL IPO Allotment Status: बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
5
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
6
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
7
एनपीएसधारकांसाठी आली गूड न्यूज, आता मिळणार 'निश्चित' पेन्शनची हमी! प्रकरण काय?
8
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
9
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
10
Stock Market Today: शेअर बाजारात कमकुवत सुरुवात, निफ्टीमध्ये ८४ अंकांची घसरण; 'हे' शेअर्स आपटले
11
WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
12
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
15
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
16
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
17
बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
18
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
19
प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
20
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकनगर भागात पावसामुळे कोटींच्या घरात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:34 IST

महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाइनची समस्या सुटू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणजे श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जवळपास ४५ ते ५० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सातपूर : महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाइनची समस्या सुटू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणजे श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जवळपास ४५ ते ५० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील अनेक घरांमध्ये शिरले. अचानक पाण्याचा प्रवाह घरात घुसल्याने घरातील रहिवाशांना बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यात लहान बालके, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. या घरांमध्ये जवळपास पाच ते सात फूट पाणी शिरले होते. कामगार वर्ग असलेल्या या वसाहतीतील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. घरातील अन्नधान्य खाण्या-पिण्याचे साहित्य तर गेलेच शिवाय फ्रीज, दूरदर्शन संच, कपाट, पलंग, गाद्या, कपडे, शैक्षणिक कागदपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे, घरांचे खरेदीखत, वह्या, पुस्तके आदींचे नुकसान झाले आहे. प्रत्येक घराचे जवळपास दोन ते अडीच लाख रु पयांचे नुकसान झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हे नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घुसल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणीश्रमिकनगर येथील माळी कॉलनीत सुमारे ३०० लोकसंख्या आहे. पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या ४५ ते ५० घरांचे रीतसर पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त रहिवाशांनी केली आहे. लवकरच या ठिकाणी तसा फलक लावून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचे संतप्त रहिवाशांनी सांगितले.४माळी कॉलनीत एवढी मोठी घटना घडली असताना स्थानिक नगरसेवकांनी कोणतीही मदत केली नाही. साधी विचारपूसदेखील केली नाही. स्थानिक नगरसेवक आले आणि लांबून पाहून निघून गेले. मात्र श्री महारु द्र हनुमान पतसंस्थेच्या वतीने डाळ, तांदूळ, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची मदत उपलब्ध करून दिल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्याने घरातील साहित्य, अन्न, धान्य, महागड्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. वेळीच ड्रेनेज लाइन बदलली असती तर हे नुकसान झाले नसते. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्यात कंपाउंडची भिंत पडली आणि पाणी घरात शिरले. दोन दिवस घरातील पाणी आणि गाळ काढायला लागले.- वीरेंद्र सोनवणेअनेक वेळा स्थानिक नगरसेवकांना भेटून ड्रेनेज लाइन बदलण्याची मागणी केली आहे. ड्रेनेज लाइन लहान आहे. महानगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक घराचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण ? महापालिकेने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी.- आसमा शेखमहानगरपालिका प्रशासनाने माळी कॉलनीतील ड्रेनेजची लाइन ताबडतोब बदलण्याचे काम हाती घ्यावे. जिल्हा प्रशासनाला वेळीच माहिती दिली आहे. तरीही अद्याप पंचनामे झालेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या प्रत्येक घराचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी.- श्रीराम मंडळ

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर