शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

श्रमिकनगर भागात पावसामुळे कोटींच्या घरात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:34 IST

महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाइनची समस्या सुटू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणजे श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जवळपास ४५ ते ५० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सातपूर : महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाइनची समस्या सुटू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणजे श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जवळपास ४५ ते ५० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील अनेक घरांमध्ये शिरले. अचानक पाण्याचा प्रवाह घरात घुसल्याने घरातील रहिवाशांना बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यात लहान बालके, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. या घरांमध्ये जवळपास पाच ते सात फूट पाणी शिरले होते. कामगार वर्ग असलेल्या या वसाहतीतील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. घरातील अन्नधान्य खाण्या-पिण्याचे साहित्य तर गेलेच शिवाय फ्रीज, दूरदर्शन संच, कपाट, पलंग, गाद्या, कपडे, शैक्षणिक कागदपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे, घरांचे खरेदीखत, वह्या, पुस्तके आदींचे नुकसान झाले आहे. प्रत्येक घराचे जवळपास दोन ते अडीच लाख रु पयांचे नुकसान झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हे नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घुसल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणीश्रमिकनगर येथील माळी कॉलनीत सुमारे ३०० लोकसंख्या आहे. पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या ४५ ते ५० घरांचे रीतसर पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त रहिवाशांनी केली आहे. लवकरच या ठिकाणी तसा फलक लावून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचे संतप्त रहिवाशांनी सांगितले.४माळी कॉलनीत एवढी मोठी घटना घडली असताना स्थानिक नगरसेवकांनी कोणतीही मदत केली नाही. साधी विचारपूसदेखील केली नाही. स्थानिक नगरसेवक आले आणि लांबून पाहून निघून गेले. मात्र श्री महारु द्र हनुमान पतसंस्थेच्या वतीने डाळ, तांदूळ, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची मदत उपलब्ध करून दिल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्याने घरातील साहित्य, अन्न, धान्य, महागड्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. वेळीच ड्रेनेज लाइन बदलली असती तर हे नुकसान झाले नसते. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्यात कंपाउंडची भिंत पडली आणि पाणी घरात शिरले. दोन दिवस घरातील पाणी आणि गाळ काढायला लागले.- वीरेंद्र सोनवणेअनेक वेळा स्थानिक नगरसेवकांना भेटून ड्रेनेज लाइन बदलण्याची मागणी केली आहे. ड्रेनेज लाइन लहान आहे. महानगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक घराचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण ? महापालिकेने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी.- आसमा शेखमहानगरपालिका प्रशासनाने माळी कॉलनीतील ड्रेनेजची लाइन ताबडतोब बदलण्याचे काम हाती घ्यावे. जिल्हा प्रशासनाला वेळीच माहिती दिली आहे. तरीही अद्याप पंचनामे झालेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या प्रत्येक घराचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी.- श्रीराम मंडळ

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर