शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:41 IST

उमराणे : उमराणेसह परिसरात गेल्या पंधरवाड्यापासुन सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीवर आलेल्या डाळींब बागांत पाणी साचल्याने तेल्या रोगाने थैमान घातले असुन डाळींब उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देआर्थिक फटका : डाळिंबावर तेल्या तर मका पिकात पाणी साचल्याने कापणी लांबणीवर

उमराणे : उमराणेसह परिसरात गेल्या पंधरवाड्यापासुन सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीवर आलेल्या डाळींब बागांत पाणी साचल्याने तेल्या रोगाने थैमान घातले असुन डाळींब उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे.तसेच मका पिकही कापणीला आले असतानाच शेतात पाणी साचल्याने मका पिक काढणीसाठी शेतकरी विवंचनेत सापडला आहे. मागील वर्षी लष्करी अळींने थैमान घातल्यानंतर मागील वर्षीची तुट भरुन काढण्यासाठी शेतकर्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मका पिकांची पेरणी केली होती.त्या अपेक्षेने सुरुवातीपासूनच चांगला पाऊस असल्याने मका पिक चांगले आलेही मात्र गेल्या पंधरवाड्यापासुन सतत व जोरदार पाऊस पडत असल्याने काही जमीनी उपळल्या असुन काही जमीनीत पाणी साचल्याने मका कापणीचा प्रश्न भेडसावत आहे. तर दुसरीकडे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणार्या डाळींबांनाही या अतीपावसाचा मोठ्या फटका बसला असुन शेतातील साचलेल्या पाण्यामुळे तेल्या व मररोगांसारखा प्रादुर्भाव होऊन झाडाला आलेली फळे गळून पडल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त मका व डाळींब उत्पादक शेतकर्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. दरम्यान येथील शेतकरी शैलेश नानाजी देवरे यांचे अडीच एकर डाळींबाचे क्षेत्र अतीपावसामुळे बाधीत झाल्याने डाळींब झाडावर तसेच फळांवर तेल्या, मररोग आदिंसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन काढणीला आलेले फळे पुर्णत: खराब होऊन गळून पडली आहेत. त्यामुळे डाळींब पिका पासुन मिळणारे उत्पन्न तर दूरच परंतु उत्पादनासाठी केलेले खचर्ही वाया गेला असुन अशा कितीतरी शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस