शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:41 IST

उमराणे : उमराणेसह परिसरात गेल्या पंधरवाड्यापासुन सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीवर आलेल्या डाळींब बागांत पाणी साचल्याने तेल्या रोगाने थैमान घातले असुन डाळींब उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देआर्थिक फटका : डाळिंबावर तेल्या तर मका पिकात पाणी साचल्याने कापणी लांबणीवर

उमराणे : उमराणेसह परिसरात गेल्या पंधरवाड्यापासुन सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीवर आलेल्या डाळींब बागांत पाणी साचल्याने तेल्या रोगाने थैमान घातले असुन डाळींब उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे.तसेच मका पिकही कापणीला आले असतानाच शेतात पाणी साचल्याने मका पिक काढणीसाठी शेतकरी विवंचनेत सापडला आहे. मागील वर्षी लष्करी अळींने थैमान घातल्यानंतर मागील वर्षीची तुट भरुन काढण्यासाठी शेतकर्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मका पिकांची पेरणी केली होती.त्या अपेक्षेने सुरुवातीपासूनच चांगला पाऊस असल्याने मका पिक चांगले आलेही मात्र गेल्या पंधरवाड्यापासुन सतत व जोरदार पाऊस पडत असल्याने काही जमीनी उपळल्या असुन काही जमीनीत पाणी साचल्याने मका कापणीचा प्रश्न भेडसावत आहे. तर दुसरीकडे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणार्या डाळींबांनाही या अतीपावसाचा मोठ्या फटका बसला असुन शेतातील साचलेल्या पाण्यामुळे तेल्या व मररोगांसारखा प्रादुर्भाव होऊन झाडाला आलेली फळे गळून पडल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त मका व डाळींब उत्पादक शेतकर्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. दरम्यान येथील शेतकरी शैलेश नानाजी देवरे यांचे अडीच एकर डाळींबाचे क्षेत्र अतीपावसामुळे बाधीत झाल्याने डाळींब झाडावर तसेच फळांवर तेल्या, मररोग आदिंसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन काढणीला आलेले फळे पुर्णत: खराब होऊन गळून पडली आहेत. त्यामुळे डाळींब पिका पासुन मिळणारे उत्पन्न तर दूरच परंतु उत्पादनासाठी केलेले खचर्ही वाया गेला असुन अशा कितीतरी शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस