शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

सध्याची परिस्थिती देशाला विभाजनाकडे नेणारी : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 18:56 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान होणार असून, आता त्यात कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही खात्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचे घोडे अडलेले नाही.

ठळक मुद्दे खातेवाटपाचे घोडे अडलेले नाहीखात्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : देशात एनआरसी व सीएबी या नवीन कायद्याने ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे, हिंसाचाराच्या घटना घडत असून, हा हिंसाचार का होतोय, तो घडविण्यामागची प्रेरणा कोणाची आहे, याची चौकशी झाली पाहिजे. सध्या देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अराजकता माजविणारी व देशाला विभाजनाकडे नेणारी असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान होणार असून, आता त्यात कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही खात्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचे घोडे अडलेले नाही. खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत आणि खातेवाटप करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे कोणा एका पक्षामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला अथवा खातेवाटपामुळे विलंब होतो या चर्चेत तथ्य नसून, शेवटी कोणालाही कोणतेही खाते दिले तरी, त्या खात्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात, असे सांगून राऊत यांनी सूचक इशारा दिला. पुणे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या कामकाजाबाबत कौतुक केले त्याबाबत पत्रकारांनी राऊत यांना छेडले असता ते म्हणाले, यापूर्वी मी शरद पवार यांच्याबद्दल बोलत होतो, आता उद्धव ठाकरे बोलत आहेत, त्यांचे स्वागत आहे. परंतु शरद पवार काय आहेत हे मी जेव्हा सांगत होतो तेव्हा लोक माझ्याकडे भुवया उंचावून पहात होते. त्यामुळे मी जी काही शरद पवार यांच्याबद्दल भूमिका मांडली होती त्याचे हे यश असल्याचेही राऊत म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले जात होते हे काही मला माहीत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद शरद पवार व शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती, असे सांगून महाविकास आघाडीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडे असेल काय या प्रश्नावर राऊत यांनी रिमोट कंट्रोल फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातच शोभत होता. परंतु शरद पवार यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याचेही राऊत यांनी मोठ्या गौरवाने सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा