शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सध्याची परिस्थिती देशाला विभाजनाकडे नेणारी : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 18:56 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान होणार असून, आता त्यात कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही खात्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचे घोडे अडलेले नाही.

ठळक मुद्दे खातेवाटपाचे घोडे अडलेले नाहीखात्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : देशात एनआरसी व सीएबी या नवीन कायद्याने ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे, हिंसाचाराच्या घटना घडत असून, हा हिंसाचार का होतोय, तो घडविण्यामागची प्रेरणा कोणाची आहे, याची चौकशी झाली पाहिजे. सध्या देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अराजकता माजविणारी व देशाला विभाजनाकडे नेणारी असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान होणार असून, आता त्यात कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही खात्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचे घोडे अडलेले नाही. खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत आणि खातेवाटप करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे कोणा एका पक्षामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला अथवा खातेवाटपामुळे विलंब होतो या चर्चेत तथ्य नसून, शेवटी कोणालाही कोणतेही खाते दिले तरी, त्या खात्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात, असे सांगून राऊत यांनी सूचक इशारा दिला. पुणे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या कामकाजाबाबत कौतुक केले त्याबाबत पत्रकारांनी राऊत यांना छेडले असता ते म्हणाले, यापूर्वी मी शरद पवार यांच्याबद्दल बोलत होतो, आता उद्धव ठाकरे बोलत आहेत, त्यांचे स्वागत आहे. परंतु शरद पवार काय आहेत हे मी जेव्हा सांगत होतो तेव्हा लोक माझ्याकडे भुवया उंचावून पहात होते. त्यामुळे मी जी काही शरद पवार यांच्याबद्दल भूमिका मांडली होती त्याचे हे यश असल्याचेही राऊत म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले जात होते हे काही मला माहीत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद शरद पवार व शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती, असे सांगून महाविकास आघाडीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडे असेल काय या प्रश्नावर राऊत यांनी रिमोट कंट्रोल फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातच शोभत होता. परंतु शरद पवार यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याचेही राऊत यांनी मोठ्या गौरवाने सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा