शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याच्या पूर्व उत्तर भागात पिके करपली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:13 IST

नगरसूल : येवला तालुक्यातील पूर्व उत्तर भाग हा दुष्काळसदृश बनला असून नगरसूल, राजापूर, पन्हाळे, खिर्डीसाठे, आहेरवाडी, लहित, जायदरे, हाडप सावरगाव, कुसुर, कुसमाडी, चांदगाव, नायगव्हाण, धामोडा, वाईबोथी, कोळगाव, ममदापूर, सायगाव, मातूलठाण आदी परिसरातील उभी पिके पाण्याअभावी करपली असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. या परिसरात मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी ...

नगरसूल : येवला तालुक्यातील पूर्व उत्तर भाग हा दुष्काळसदृश बनला असून नगरसूल, राजापूर, पन्हाळे, खिर्डीसाठे, आहेरवाडी, लहित, जायदरे, हाडप सावरगाव, कुसुर, कुसमाडी, चांदगाव, नायगव्हाण, धामोडा, वाईबोथी, कोळगाव, ममदापूर, सायगाव, मातूलठाण आदी परिसरातील उभी पिके पाण्याअभावी करपली असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. या परिसरात मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी ही पिके घेतली जात असून, पावसाने जास्त ओढ दिल्याने पिके करपली आहेत. मका, बाजरीच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरी कोरड्या झाल्या आहेत. जवळपास बहुतेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या विहिरीत टॅँकर टाकले असून ते पाणी संपले आहे. घरचा चारा कधीच संपला आहे. शेतकºयांपुढे चारा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. शासनाने कर्जमाफी केली ती अल्पशा प्रमाणात नियमाप्रमाणे कर्ज फेड करणाºया शेतकºयांच्या हातावर तुरी देऊन गाजर दाखविले. अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा झाला नाही. घरातले काढून शेतात पेरले तेही पावसाअभावी जळून गेले जर दोन दिवसात पाऊस आला नाही तर परिस्थिती गंभीर बनेल. शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा व या भागात टॅँकरने पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा छावण्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जनावरांना तलाठी कार्यालयामार्फत चारा उपलब्ध करून द्यावा, वीजबिल माफ करा, कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकºयांचे कर्ज माफ करावे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढू.- सुभाष निकम, नगरसूल

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस