शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान ; निसर्ग चक्रीवादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:34 IST

निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे  झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्दे ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना फटकाप्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसाननाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी अडचणीत

नाशिक: मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे  झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले. यामध्ये मका पीकाचे सर्वाधिक नुकसान झाले.      अरबी समुद्रात उठलेल्या निसर्ग चक्रीवादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असतांनाच उत्तर महाराष्ट्राजवळून गेलेल्या चक्रीवादळाचा उद्रेक जिल्ह्यात झाला नसला तरी या चक्रीवादळच्या प्रभावामुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वादळीवाऱ्याचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले.     वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या आधिकाऱ्यांनी केले असून प्राथमिक अहवालानुसानर ५१५ हेक्टरवरील पीकाचे नुकसान झाले असून मका, ऊस आणि फळपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा नाशिक, सिन्नर, निफाड आणि इगतपुरी तालुक्यांतील गावांना बसला सिन्नरमधील २३ गावांमध्ये पावसाने चांगलेच नुकसान केले. या तालुक्यातील ४६० शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले.  भरवशाचे मका पीक वाया गेले आहे. नाशिक तालुक्यातील २४ गावांमधील २३८ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे.      मालेगाव, सटाणा, नांदवाग, इगतपुरी, निफाड, चांदवड या तालुक्यांमध्ये देखील काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ७७६ शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला यामध्ये सर्वाधिक सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या खोलाखाल नाशिक तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मका, ऊस आणि भाजीपाला तसेच फळपीकांचे या पावसाने नुकसान केले आहे. जिल्ह्यातील एकुण स्थितीजिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांचे चक्रीवादळ आणि पावसाने नुकसान केले आहे. ७७६ शेतकऱ्यांच्या एकुण ५१५हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मका-२५६.६०, ऊस- ३१.६०, भाजीपाला- १४०.५०, फळपीके-४६.७० हेक्टर याप्रमाणे पीकांचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी