शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

जिल्ह्यातील ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान ; निसर्ग चक्रीवादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:34 IST

निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे  झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्दे ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना फटकाप्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसाननाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी अडचणीत

नाशिक: मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे  झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले. यामध्ये मका पीकाचे सर्वाधिक नुकसान झाले.      अरबी समुद्रात उठलेल्या निसर्ग चक्रीवादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असतांनाच उत्तर महाराष्ट्राजवळून गेलेल्या चक्रीवादळाचा उद्रेक जिल्ह्यात झाला नसला तरी या चक्रीवादळच्या प्रभावामुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वादळीवाऱ्याचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले.     वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या आधिकाऱ्यांनी केले असून प्राथमिक अहवालानुसानर ५१५ हेक्टरवरील पीकाचे नुकसान झाले असून मका, ऊस आणि फळपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा नाशिक, सिन्नर, निफाड आणि इगतपुरी तालुक्यांतील गावांना बसला सिन्नरमधील २३ गावांमध्ये पावसाने चांगलेच नुकसान केले. या तालुक्यातील ४६० शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले.  भरवशाचे मका पीक वाया गेले आहे. नाशिक तालुक्यातील २४ गावांमधील २३८ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे.      मालेगाव, सटाणा, नांदवाग, इगतपुरी, निफाड, चांदवड या तालुक्यांमध्ये देखील काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ७७६ शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला यामध्ये सर्वाधिक सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या खोलाखाल नाशिक तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मका, ऊस आणि भाजीपाला तसेच फळपीकांचे या पावसाने नुकसान केले आहे. जिल्ह्यातील एकुण स्थितीजिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांचे चक्रीवादळ आणि पावसाने नुकसान केले आहे. ७७६ शेतकऱ्यांच्या एकुण ५१५हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मका-२५६.६०, ऊस- ३१.६०, भाजीपाला- १४०.५०, फळपीके-४६.७० हेक्टर याप्रमाणे पीकांचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी