शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:03 IST

अभोणा : जुलै महिना सुरू झाला, तरी अध्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या ८ टक्के पेरण्याही पावसाअभावी उलटण्याचा धोका असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देपेरण्या धोक्यात : कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आव्हान

अभोणा : जुलै महिना सुरू झाला, तरी अध्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या ८ टक्के पेरण्याही पावसाअभावी उलटण्याचा धोका असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.जूनच्या सुरुवातीला पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली. मात्र, पुढे महिनाभर पावसाने अवकृपा दाखविली. त्यामुळे खरिपाचे नियोजन पुरते कोलमडल्याची स्थिती आहे. अंकुरलेली पिके कोमेजू लागली आहेत. दुसरीकडे कृषी विभागाकडून ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. येत्या काळात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करण्याची पाळी येऊ शकते, तर समाधानकारक पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या कधी होतील, याची काळजी शेतकऱ्यांना आहे, तर दुसरीकडे यावेळी महागडे बियाणे पेरण्यास शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही. त्यामुळेही पेरण्या रखडलेल्या आहेत. सध्याच्या कोरोना काळात शेतकरी विविध संकटांचा सामना करीत असून, आर्थिक समस्येला त्याला तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, पावसाने ओढ दिल्याने तालुक्यासह संपूर्ण कसमापट्टा, तसेच खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या चणकापूर (१६ टक्के) व पुनंद (१४ टक्के) प्रकल्पात आजअखेर पाणीसाठा आहे. तालुक्यातील धनोली, भेगू, गोबापूर, माळेगाव, बोरदैवत, मार्कंडपिंप्री, धार्डे दिगर, खिराड, ओतुर, भांडणे, जामलेवणी, नांदूरी हे लघुसिंचन प्रकल्प अध्यापही कोरडेच आहेत. तालुक्याचे खरीप सर्वसाधारण क्षेत्र ४६,२४१ हेक्टर असून, यंदा जूनअखेर ३,६६० हेक्टरवर (८ टक्के) पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच सुमारास ७१ टक्के पेरणी झाली होती.तालुक्याचे पर्जन्यमान ६३५ मिमी. असून, जून, २०२० अखेर १५९ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र जूनअखेर ५६.२ मिमी पाऊस झाला आहे.पाऊस नसल्यामुळे टोमॅटो, मिरची व इतर भाजीपाला अशा पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. पाऊस लांबल्यास सोयाबीन, मका, उडीद, मूग ही पिकेही धोक्यात येतील.- योगेश पाटील, शेतकरी, दह्याणे, ता. कळवण.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी