शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

पावसाने ओढ दिल्याने संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:03 IST

अभोणा : जुलै महिना सुरू झाला, तरी अध्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या ८ टक्के पेरण्याही पावसाअभावी उलटण्याचा धोका असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देपेरण्या धोक्यात : कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आव्हान

अभोणा : जुलै महिना सुरू झाला, तरी अध्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या ८ टक्के पेरण्याही पावसाअभावी उलटण्याचा धोका असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.जूनच्या सुरुवातीला पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली. मात्र, पुढे महिनाभर पावसाने अवकृपा दाखविली. त्यामुळे खरिपाचे नियोजन पुरते कोलमडल्याची स्थिती आहे. अंकुरलेली पिके कोमेजू लागली आहेत. दुसरीकडे कृषी विभागाकडून ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. येत्या काळात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करण्याची पाळी येऊ शकते, तर समाधानकारक पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या कधी होतील, याची काळजी शेतकऱ्यांना आहे, तर दुसरीकडे यावेळी महागडे बियाणे पेरण्यास शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही. त्यामुळेही पेरण्या रखडलेल्या आहेत. सध्याच्या कोरोना काळात शेतकरी विविध संकटांचा सामना करीत असून, आर्थिक समस्येला त्याला तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, पावसाने ओढ दिल्याने तालुक्यासह संपूर्ण कसमापट्टा, तसेच खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या चणकापूर (१६ टक्के) व पुनंद (१४ टक्के) प्रकल्पात आजअखेर पाणीसाठा आहे. तालुक्यातील धनोली, भेगू, गोबापूर, माळेगाव, बोरदैवत, मार्कंडपिंप्री, धार्डे दिगर, खिराड, ओतुर, भांडणे, जामलेवणी, नांदूरी हे लघुसिंचन प्रकल्प अध्यापही कोरडेच आहेत. तालुक्याचे खरीप सर्वसाधारण क्षेत्र ४६,२४१ हेक्टर असून, यंदा जूनअखेर ३,६६० हेक्टरवर (८ टक्के) पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच सुमारास ७१ टक्के पेरणी झाली होती.तालुक्याचे पर्जन्यमान ६३५ मिमी. असून, जून, २०२० अखेर १५९ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र जूनअखेर ५६.२ मिमी पाऊस झाला आहे.पाऊस नसल्यामुळे टोमॅटो, मिरची व इतर भाजीपाला अशा पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. पाऊस लांबल्यास सोयाबीन, मका, उडीद, मूग ही पिकेही धोक्यात येतील.- योगेश पाटील, शेतकरी, दह्याणे, ता. कळवण.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी