शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:03 IST

अभोणा : जुलै महिना सुरू झाला, तरी अध्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या ८ टक्के पेरण्याही पावसाअभावी उलटण्याचा धोका असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देपेरण्या धोक्यात : कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आव्हान

अभोणा : जुलै महिना सुरू झाला, तरी अध्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या ८ टक्के पेरण्याही पावसाअभावी उलटण्याचा धोका असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.जूनच्या सुरुवातीला पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली. मात्र, पुढे महिनाभर पावसाने अवकृपा दाखविली. त्यामुळे खरिपाचे नियोजन पुरते कोलमडल्याची स्थिती आहे. अंकुरलेली पिके कोमेजू लागली आहेत. दुसरीकडे कृषी विभागाकडून ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. येत्या काळात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करण्याची पाळी येऊ शकते, तर समाधानकारक पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या कधी होतील, याची काळजी शेतकऱ्यांना आहे, तर दुसरीकडे यावेळी महागडे बियाणे पेरण्यास शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही. त्यामुळेही पेरण्या रखडलेल्या आहेत. सध्याच्या कोरोना काळात शेतकरी विविध संकटांचा सामना करीत असून, आर्थिक समस्येला त्याला तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, पावसाने ओढ दिल्याने तालुक्यासह संपूर्ण कसमापट्टा, तसेच खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या चणकापूर (१६ टक्के) व पुनंद (१४ टक्के) प्रकल्पात आजअखेर पाणीसाठा आहे. तालुक्यातील धनोली, भेगू, गोबापूर, माळेगाव, बोरदैवत, मार्कंडपिंप्री, धार्डे दिगर, खिराड, ओतुर, भांडणे, जामलेवणी, नांदूरी हे लघुसिंचन प्रकल्प अध्यापही कोरडेच आहेत. तालुक्याचे खरीप सर्वसाधारण क्षेत्र ४६,२४१ हेक्टर असून, यंदा जूनअखेर ३,६६० हेक्टरवर (८ टक्के) पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच सुमारास ७१ टक्के पेरणी झाली होती.तालुक्याचे पर्जन्यमान ६३५ मिमी. असून, जून, २०२० अखेर १५९ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र जूनअखेर ५६.२ मिमी पाऊस झाला आहे.पाऊस नसल्यामुळे टोमॅटो, मिरची व इतर भाजीपाला अशा पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. पाऊस लांबल्यास सोयाबीन, मका, उडीद, मूग ही पिकेही धोक्यात येतील.- योगेश पाटील, शेतकरी, दह्याणे, ता. कळवण.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी