शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

CoronaVirus News : हृदयस्पर्शी! कोरोनात पती गमावलेल्या दीड हजार महिलांवर कुटुंबाचा ‘कर्ता’ म्हणून जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 12:21 IST

नाशिक - कोरोना महामारीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कोणी पत्नी गमावली तर कोणी आई, कुणाचा दादा गेला तर कुणाचा मुलगा ...

नाशिक - कोरोना महामारीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कोणी पत्नी गमावली तर कोणी आई, कुणाचा दादा गेला तर कुणाचा मुलगा जग सोडून गेला. घरातील कर्ता पुरूष गेल्याने तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नींवर आली असून, पतीच्या पश्चात कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी या महिलांनी घेतली आहे. दुर्देवाचे दशावतार त्यांच्या नशिबी आले असले, तरी सारे दु:ख पचवून त्या खंबीरपणे कुटुंबासाठी उभ्या राहिल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास १,३५१ महिलाच आता कुटुंबातील ‘कर्ता’ म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

आपापल्या क्षेत्रात ध्येयनिश्चिती गाठणाऱ्या किंवा व्यवसायात प्रगती करणाऱ्या महिलांची आठवण जागतिक महिला दिनी कर्तुत्ववान महिला म्हणून केली जाते. ध्यानीमनी नसतानाही अचानक दु:खाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण कुटुंबाचा आधारच निघून गेल्यानंतर या महिला कुटुंबाचा आधार बनल्या आहेत. शून्य ते १८ वर्ष वयाच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी या महिलांवर आली आहे. कुटुंबातील वृद्ध सासू-सासरे यांचादेखील काही महिला सांभाळ करत आहेत. पतीच्या पश्चात काही थोड्याच महिलांना त्यांची नोकरी मिळू शकली, मात्र अशा अनेक महिला आहेत की त्या उपजीविकेसाठी स्वत: कष्ट करत आहेत.

पतीच्या निधनानंतर सर्वकाही पहिल्यापासून सुरू करून कुटुंबाला सावरणे ही बाब सोपी नाही. सामाजिक, कौटुंबिक घडी बसवताना आर्थिक गणितही जुळवावे लागत असल्याने त्यांना रोजच जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे. कोरोनानंतर तर माणसाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. या बदलत्या परिस्थितीत मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी या महिला उभ्या राहिल्या आहेत.

व्यापक समाजजीवनात या महिलांचा संघर्ष सामाजिक पटलावर कदाचित कधीच उमटणार नाही. मात्र, पतीनंतरच्या बदलत्या आयुष्यात प्रत्येक क्षण संघर्ष करत मुलाबाळांचा सांभाळ करणाऱ्या या मातांचा संघर्ष रणांगणातील रणरागिणीपेक्षा नक्कीच कमी नाही. कुटुंबातील कर्त्या पुरुषालाही जेथे कुटुंब सांभाळताना तडजोडी कराव्या लागतात, अशावेळी या महिलांना किती अडचणींचा सामना करावा लागत असेल, याचीही कल्पना येते.

शासनाकडून मदतीचा हातभार

अचानक वैधव्य नशिबी आलेल्या जिल्ह्यातील जवळपास १,३५१ महिलांना शासनाकडून किरकोळ आधार मिळत आहे. त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना शासनाकडून प्रतिमाणसी १,१०० रूपये सानुग्रह अनुदान मिळत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक