शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

कोरोनाच्या धसक्याने शाकाहाराला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:29 IST

कडधान्यांसह पालेभाज्या-फळभाज्यांना मागणी

ठळक मुद्देमांसाहार वर्ज्य केला असल्याने कत्तलखान्यांवर होणारी गर्दी कमी

खमताणे : कोरोनाचा धसका आता महानगरातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांनी घेतला असून, कोरोनाचा विषाणू मांसाहारातून येत असल्याच्या अफवांमुळे शाकाहाराला अधिक पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कडधान्यांसह पालेभाज्या-फळभाज्यांनाही मागणी वाढू लागली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग हा मांसाहारातून होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पोल्ट्री फार्मसह कत्तलखान्यातील विक्रेत्यांवरही जाणवू लागला आहे. या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय तर पूर्णपणे कोलमडला आहे. कोरोनाच्या धसक्याने लोक आता मांसाहाराऐवजी शाकाहाराला पसंती देत आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात शाकाहार वाढल्याने भाजीपाला-फळभाज्या यांनाही मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मांसाहार वर्ज्य केला असल्याने कत्तलखान्यांवर होणारी गर्दी कमी होऊ लागली आहे. विक्रेत्यांनी मटन-चिकनचे दर कमी केले असले तरी त्यालाही ग्राहक मिळेनासा झाला आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मेन्यूतही मांसाहार जाऊन शाकाहार आला आहे. ग्रामीण भागातील हॉटेल्स, ढाबेसुद्धा ओस पडू लागले आहेत. खवय्ये हॉटेल्स, ढाबे यांच्याकडे पाठ फिरवू लागल्याने हॉटेल व्यवसायही अडचणीत सापडला आहे. या व्यवसायातील रोजगारावरही त्यामुळे गंडांतर आले आहे. सध्या ग्रामीण भागात ओट्यांवर, पारावर, रस्त्यावर, बस स्टॅण्डवर आणि विवाह सोहळ्यांच्या ठिकाणी कोरोनाचीच चर्चा कानी पडत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या