शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाच्या धसक्याने शाकाहाराला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:29 IST

कडधान्यांसह पालेभाज्या-फळभाज्यांना मागणी

ठळक मुद्देमांसाहार वर्ज्य केला असल्याने कत्तलखान्यांवर होणारी गर्दी कमी

खमताणे : कोरोनाचा धसका आता महानगरातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांनी घेतला असून, कोरोनाचा विषाणू मांसाहारातून येत असल्याच्या अफवांमुळे शाकाहाराला अधिक पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कडधान्यांसह पालेभाज्या-फळभाज्यांनाही मागणी वाढू लागली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग हा मांसाहारातून होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पोल्ट्री फार्मसह कत्तलखान्यातील विक्रेत्यांवरही जाणवू लागला आहे. या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय तर पूर्णपणे कोलमडला आहे. कोरोनाच्या धसक्याने लोक आता मांसाहाराऐवजी शाकाहाराला पसंती देत आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात शाकाहार वाढल्याने भाजीपाला-फळभाज्या यांनाही मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मांसाहार वर्ज्य केला असल्याने कत्तलखान्यांवर होणारी गर्दी कमी होऊ लागली आहे. विक्रेत्यांनी मटन-चिकनचे दर कमी केले असले तरी त्यालाही ग्राहक मिळेनासा झाला आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मेन्यूतही मांसाहार जाऊन शाकाहार आला आहे. ग्रामीण भागातील हॉटेल्स, ढाबेसुद्धा ओस पडू लागले आहेत. खवय्ये हॉटेल्स, ढाबे यांच्याकडे पाठ फिरवू लागल्याने हॉटेल व्यवसायही अडचणीत सापडला आहे. या व्यवसायातील रोजगारावरही त्यामुळे गंडांतर आले आहे. सध्या ग्रामीण भागात ओट्यांवर, पारावर, रस्त्यावर, बस स्टॅण्डवर आणि विवाह सोहळ्यांच्या ठिकाणी कोरोनाचीच चर्चा कानी पडत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या