शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कोरोनाच्या ‘भयपर्वा’त 'या' ठिकाणी तब्बल पावणे 5 लाख नागरिक बाधित; ग्रामीणमध्ये सर्वाधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 19:15 IST

नाशिक - जिल्ह्यातील बळींच्या संख्येने कोरोनाच्या प्रारंभाच्या तारखेपासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ७६ हजार २ इतके नागरिक जिल्ह्यात बाधित आढळून ...

नाशिक - जिल्ह्यातील बळींच्या संख्येने कोरोनाच्या प्रारंभाच्या तारखेपासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ७६ हजार २ इतके नागरिक जिल्ह्यात बाधित आढळून आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील १२ नागरिकांपैकी १ नागरिक एकदा तरी बाधित झाल्याची अधिकृत नोंद आहे. तर कोरोनाचा पहिला बळी नाशिक जिल्ह्यात ८ एप्रिल २०२० या दिवशी गेला. तेव्हापासून आतापर्यंतच्या २ वर्षांच्या कालावधीत ८ हजार ९०० बळींची अधिकृत नोंद झाली आहे. तरी अनधिकृत किंवा जे भीतीपोटी किंवा रुग्णालयेच उपलब्ध नसल्याने बळी गेलेल्यांच्या संख्येबाबत तर अद्यापही संभ्रम कायम आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ७६ हजार २ रुग्ण बाधित, तर ४ लाख ६७ हजार ८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्या तारखेला जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला, त्याच्या एक दिवस अगोदर अर्थात २८ मार्चला जिल्ह्यात आता कोरोना उपचारार्थी संख्या अवघी १५, तर प्रलंबित अहवालांची संख्या केवळ ६६ आहे. आतापर्यंतच्या बळींच्या संख्येचे वर्गीकरण ३ भागात केल्यास पहिले ३ हजार बळी होण्यासाठी ३७५ दिवस म्हणजे जवळपास एक वर्षभराहून अधिक कालावधी गेला होता. तर त्यानंतरचे ३ हजार बळी अवघ्या ५४ दिवसात म्हणजे अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत गेले आहेत. नाशिकसाठी मार्च २०२१, एप्रिल आणि मे २०२१ हे तीन महिने सर्वाधिक घातक ठरले. त्यातही एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतच जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, त्याच काळादरम्यान गेलेले शेकडो बळी पोर्टलवर अपलोडच केले गेले नसल्याने जून महिन्यात जेव्हा त्यांची नोंदणी झाली, त्यानंतर ५ ते ८ हजार बळींचा टप्पा जूनच्या अवघ्या २ आठवड्यात पूर्ण झाला होता.

सर्वाधिक बळी ग्रामीणमध्ये

जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या अगदी प्रारंभीच्या काळात मालेगाव भागात वेगाने बळी जात होते. त्यानंतर नाशिक शहरातील बळींच्या संख्येत ऑगस्ट २०२० आणि सप्टेंबर २०२० मध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली. तर दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१ आणि मे २०२१ या महिन्यात नाशिक ग्रामीण क्षेत्रातील बळी प्रचंड वेगाने वाढले होते. त्यामुळे नाशिक ग्रामीणचे बळी ४३०४, नाशिक मनपा क्षेत्रात ४१०५, मालेगाव मनपा क्षेत्रात ३६४, तर जिल्हाबाह्य १२६ जणांचा बळी गेला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस