शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या ‘भयपर्वा’त 'या' ठिकाणी तब्बल पावणे 5 लाख नागरिक बाधित; ग्रामीणमध्ये सर्वाधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 19:15 IST

नाशिक - जिल्ह्यातील बळींच्या संख्येने कोरोनाच्या प्रारंभाच्या तारखेपासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ७६ हजार २ इतके नागरिक जिल्ह्यात बाधित आढळून ...

नाशिक - जिल्ह्यातील बळींच्या संख्येने कोरोनाच्या प्रारंभाच्या तारखेपासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ७६ हजार २ इतके नागरिक जिल्ह्यात बाधित आढळून आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील १२ नागरिकांपैकी १ नागरिक एकदा तरी बाधित झाल्याची अधिकृत नोंद आहे. तर कोरोनाचा पहिला बळी नाशिक जिल्ह्यात ८ एप्रिल २०२० या दिवशी गेला. तेव्हापासून आतापर्यंतच्या २ वर्षांच्या कालावधीत ८ हजार ९०० बळींची अधिकृत नोंद झाली आहे. तरी अनधिकृत किंवा जे भीतीपोटी किंवा रुग्णालयेच उपलब्ध नसल्याने बळी गेलेल्यांच्या संख्येबाबत तर अद्यापही संभ्रम कायम आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ७६ हजार २ रुग्ण बाधित, तर ४ लाख ६७ हजार ८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्या तारखेला जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला, त्याच्या एक दिवस अगोदर अर्थात २८ मार्चला जिल्ह्यात आता कोरोना उपचारार्थी संख्या अवघी १५, तर प्रलंबित अहवालांची संख्या केवळ ६६ आहे. आतापर्यंतच्या बळींच्या संख्येचे वर्गीकरण ३ भागात केल्यास पहिले ३ हजार बळी होण्यासाठी ३७५ दिवस म्हणजे जवळपास एक वर्षभराहून अधिक कालावधी गेला होता. तर त्यानंतरचे ३ हजार बळी अवघ्या ५४ दिवसात म्हणजे अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत गेले आहेत. नाशिकसाठी मार्च २०२१, एप्रिल आणि मे २०२१ हे तीन महिने सर्वाधिक घातक ठरले. त्यातही एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतच जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, त्याच काळादरम्यान गेलेले शेकडो बळी पोर्टलवर अपलोडच केले गेले नसल्याने जून महिन्यात जेव्हा त्यांची नोंदणी झाली, त्यानंतर ५ ते ८ हजार बळींचा टप्पा जूनच्या अवघ्या २ आठवड्यात पूर्ण झाला होता.

सर्वाधिक बळी ग्रामीणमध्ये

जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या अगदी प्रारंभीच्या काळात मालेगाव भागात वेगाने बळी जात होते. त्यानंतर नाशिक शहरातील बळींच्या संख्येत ऑगस्ट २०२० आणि सप्टेंबर २०२० मध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली. तर दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१ आणि मे २०२१ या महिन्यात नाशिक ग्रामीण क्षेत्रातील बळी प्रचंड वेगाने वाढले होते. त्यामुळे नाशिक ग्रामीणचे बळी ४३०४, नाशिक मनपा क्षेत्रात ४१०५, मालेगाव मनपा क्षेत्रात ३६४, तर जिल्हाबाह्य १२६ जणांचा बळी गेला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस