शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत प्रवेशासाठी कोरोना चाचणी दाखला आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:15 IST

सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी ...

सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी बु., पांढुर्ली, नायगाव, वडांगळी व वावी उपबाजार आवारात आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. निगेटिव्ह दाखला व टोकन असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सभापती लक्ष्मणराव शेळके, सचिव विजय विखे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बाजार समितीचे कामकाज बंद होते. मात्र, सोमवारपासून बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारासह उपबाजार आवारांतील कामकाज सुरू होत असून, कोरोना विषाणू (कोविड - १९) या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिन्नर मुख्य बाजार आवारात कांदा मालाचे लिलाव दर सोमवार, मंगळावार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी तसेच नांदुरशिंगोटे उपबाजार येथे दर सोमवार व शुक्रवारी, दोडी बु. उपबाजार येथे दर बुधवार, नायगांव उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार व वडांगळी उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार याप्रमाणे शेतमालाचे लिलाव होतील. परंतु बाजार आवारात पिकअप ५० व ट्रॅक्टर १०० अशा एकूण १५० वाहनांचेच दिलेल्या टोकनप्रमाणे लिलाव होणार असल्याने कांदा शेतमाल विक्रीस आणताना अगोदरचे दिवशी शेतकर्‍यांनी प्रथम कोरोनाची आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. चाचणी करून घेणे आवश्यक आहे व नंतर टोकन घेऊनच कांदा शेतमाला विक्रीसाठी आणावयाचा आहे.

------------------

शेतकऱ्यांना टोकन

बाजार आवारात येताना केवळ दोन व्यक्तीच (वाहनचालक व शेतकरी) यांनी आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. कोरोना चाचणी निगेटिव्ह असा शेरा असल्याचा दाखला बाजार आवाराच्या गेटवर दाखविल्यानंतरच प्रवेश दिला जाईल तसेच बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना टोकन नंबर दिले जातील. त्याप्रमाणे संबंधीत शेतकर्‍यांनी दिलेल्या तारखेस टोकनप्रमाणे आपले वाहन बाजार आवारात कांदा माल विक्रीसाठी घेऊन यावे. दिनांकाप्रमाणे नाव नोंदणी केल्याशिवाय व टोकन नंबर सोबत असल्याशिवाय बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही. लिलाव सुरू झाल्यानंतर फक्त माल विक्रेता शेतकरीच वाहनाजवळ थांबेल.

-----------

नियमांचे पालन करावे

बाजार आवारात अनावश्यक गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिंग पाळावे. वाहन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याने आपले नाक, तोंड, कान यावर शेतमाल विक्री करून घरी परतत नाही तोपर्यंत मास्क, रुमाल बांधणे आवश्यक राहील. लिलाव झाल्यानंतर क्रमवारीप्रमाणेच गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून आपले वाहन लाईनमध्ये काट्यावर घेऊन जायचे आहे, अशा सूचना संचालक मंडळाने केल्या आहेत.