शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

बाजार समितीत प्रवेशासाठी कोरोना चाचणी दाखला आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:15 IST

सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी ...

सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी बु., पांढुर्ली, नायगाव, वडांगळी व वावी उपबाजार आवारात आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. निगेटिव्ह दाखला व टोकन असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सभापती लक्ष्मणराव शेळके, सचिव विजय विखे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बाजार समितीचे कामकाज बंद होते. मात्र, सोमवारपासून बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारासह उपबाजार आवारांतील कामकाज सुरू होत असून, कोरोना विषाणू (कोविड - १९) या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिन्नर मुख्य बाजार आवारात कांदा मालाचे लिलाव दर सोमवार, मंगळावार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी तसेच नांदुरशिंगोटे उपबाजार येथे दर सोमवार व शुक्रवारी, दोडी बु. उपबाजार येथे दर बुधवार, नायगांव उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार व वडांगळी उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार याप्रमाणे शेतमालाचे लिलाव होतील. परंतु बाजार आवारात पिकअप ५० व ट्रॅक्टर १०० अशा एकूण १५० वाहनांचेच दिलेल्या टोकनप्रमाणे लिलाव होणार असल्याने कांदा शेतमाल विक्रीस आणताना अगोदरचे दिवशी शेतकर्‍यांनी प्रथम कोरोनाची आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. चाचणी करून घेणे आवश्यक आहे व नंतर टोकन घेऊनच कांदा शेतमाला विक्रीसाठी आणावयाचा आहे.

------------------

शेतकऱ्यांना टोकन

बाजार आवारात येताना केवळ दोन व्यक्तीच (वाहनचालक व शेतकरी) यांनी आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. कोरोना चाचणी निगेटिव्ह असा शेरा असल्याचा दाखला बाजार आवाराच्या गेटवर दाखविल्यानंतरच प्रवेश दिला जाईल तसेच बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना टोकन नंबर दिले जातील. त्याप्रमाणे संबंधीत शेतकर्‍यांनी दिलेल्या तारखेस टोकनप्रमाणे आपले वाहन बाजार आवारात कांदा माल विक्रीसाठी घेऊन यावे. दिनांकाप्रमाणे नाव नोंदणी केल्याशिवाय व टोकन नंबर सोबत असल्याशिवाय बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही. लिलाव सुरू झाल्यानंतर फक्त माल विक्रेता शेतकरीच वाहनाजवळ थांबेल.

-----------

नियमांचे पालन करावे

बाजार आवारात अनावश्यक गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिंग पाळावे. वाहन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याने आपले नाक, तोंड, कान यावर शेतमाल विक्री करून घरी परतत नाही तोपर्यंत मास्क, रुमाल बांधणे आवश्यक राहील. लिलाव झाल्यानंतर क्रमवारीप्रमाणेच गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून आपले वाहन लाईनमध्ये काट्यावर घेऊन जायचे आहे, अशा सूचना संचालक मंडळाने केल्या आहेत.