शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

बाजार समितीत प्रवेशासाठी कोरोना चाचणी दाखला आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:15 IST

सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी ...

सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी बु., पांढुर्ली, नायगाव, वडांगळी व वावी उपबाजार आवारात आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. निगेटिव्ह दाखला व टोकन असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सभापती लक्ष्मणराव शेळके, सचिव विजय विखे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बाजार समितीचे कामकाज बंद होते. मात्र, सोमवारपासून बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारासह उपबाजार आवारांतील कामकाज सुरू होत असून, कोरोना विषाणू (कोविड - १९) या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिन्नर मुख्य बाजार आवारात कांदा मालाचे लिलाव दर सोमवार, मंगळावार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी तसेच नांदुरशिंगोटे उपबाजार येथे दर सोमवार व शुक्रवारी, दोडी बु. उपबाजार येथे दर बुधवार, नायगांव उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार व वडांगळी उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार याप्रमाणे शेतमालाचे लिलाव होतील. परंतु बाजार आवारात पिकअप ५० व ट्रॅक्टर १०० अशा एकूण १५० वाहनांचेच दिलेल्या टोकनप्रमाणे लिलाव होणार असल्याने कांदा शेतमाल विक्रीस आणताना अगोदरचे दिवशी शेतकर्‍यांनी प्रथम कोरोनाची आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. चाचणी करून घेणे आवश्यक आहे व नंतर टोकन घेऊनच कांदा शेतमाला विक्रीसाठी आणावयाचा आहे.

------------------

शेतकऱ्यांना टोकन

बाजार आवारात येताना केवळ दोन व्यक्तीच (वाहनचालक व शेतकरी) यांनी आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. कोरोना चाचणी निगेटिव्ह असा शेरा असल्याचा दाखला बाजार आवाराच्या गेटवर दाखविल्यानंतरच प्रवेश दिला जाईल तसेच बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना टोकन नंबर दिले जातील. त्याप्रमाणे संबंधीत शेतकर्‍यांनी दिलेल्या तारखेस टोकनप्रमाणे आपले वाहन बाजार आवारात कांदा माल विक्रीसाठी घेऊन यावे. दिनांकाप्रमाणे नाव नोंदणी केल्याशिवाय व टोकन नंबर सोबत असल्याशिवाय बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही. लिलाव सुरू झाल्यानंतर फक्त माल विक्रेता शेतकरीच वाहनाजवळ थांबेल.

-----------

नियमांचे पालन करावे

बाजार आवारात अनावश्यक गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिंग पाळावे. वाहन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याने आपले नाक, तोंड, कान यावर शेतमाल विक्री करून घरी परतत नाही तोपर्यंत मास्क, रुमाल बांधणे आवश्यक राहील. लिलाव झाल्यानंतर क्रमवारीप्रमाणेच गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून आपले वाहन लाईनमध्ये काट्यावर घेऊन जायचे आहे, अशा सूचना संचालक मंडळाने केल्या आहेत.