शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

कोरोनाने रोखली वारकऱ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 9:28 PM

अवघे अवघे सारे जण! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघणाºया दिंड्यांची वाट कोरोनाने रोखली आहे. जवळपास शंभर वर्षांची परंपरा खंडित झाल्याने निफाड तालुक्यातील शेकडो दिंड्या यंदा जाणार नसल्याने वारकºयांची अखंडतेची परंपरा खंडित होत आहे.

ठळक मुद्देशेकडो दिंड्या : अनेक वर्षांची परंपरा खंडित झाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड

सायखेडा : अवघे अवघे सारे जण! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघणाºया दिंड्यांची वाट कोरोनाने रोखली आहे. जवळपास शंभर वर्षांची परंपरा खंडित झाल्याने निफाड तालुक्यातील शेकडो दिंड्या यंदा जाणार नसल्याने वारकºयांची अखंडतेची परंपरा खंडित होत आहे.आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना गावागावांतून हजारो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. रस्त्याच्या कडेने चालणारे वारकरी हातात भगवी पताका, गळ्यात टाळ मृदंग, विठुरायाच्या पादुका असणारी पालखी यासोबतच वारकºयांच्या मधुर कंठातून निघणारे भजनांचे सुरेल स्वर, मजल दरमजल करीत अनेक गावांतून विठुरायाचा गजर दिसणार नसल्याने भाविक भक्तांचा हिरमोड झाला आहे. निफाड तालुक्यातून जाणाºया शेकडो दिंड्या जवळपास वीस दिवस पायी चालत हे वारकरी पंढरपूरला पोहोचतात. अनेक गावांमध्ये मुक्काम करून त्या गावांमध्ये रात्रीचा कीर्तन सोहळा पार पाडतात. यंदा मात्र हे चित्र पाहायला मिळत नसल्याने वारकरी आणि भाविकांना काही तरी चुकल्यासारखे वाटत आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकºयांना यंदा या अमृतमय सोहळ्यापासून दूर राहावे लागणार आहे. म्हणूनच सारे वारकरी कोरोना रोगाचे थैमान थांबावे यासाठी विठुरायाला साकडे घालत आहे. कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने यंदा राज्यातील सर्वच देवस्थानांची दारे बंद केली आहे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक स्थळ सुरू नसून गर्दी टाळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जमणारा भाविकांचा महामेळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

निफाड तालुक्यातून दरवर्षी पंढरपूरला पायी दिंडी सोहळ्यासाठी हजारो वारकरी आणि भाविक जात असतात. यंदा मात्र शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने खूप काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे.- चंदू राजोळे, अध्यक्ष, निफाड तालुका वारकरी सांप्रदाय

कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा अनेक वर्षांची परंपरा असणाºया दिंडी प्रथा बंद केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे वारकºयांच्या वतीने स्वागतच आहे. आम्ही वारकरीदेखील प्रतिसाद देत शेकडो वर्षांची परंपरा थांबवत असलो तरी यंदा दिंडीचा सोहळा आणि विठुरायाचे दर्शन होत नसल्याची सल मात्र मनात कायम आहे.- पृथ्वीबाबा शिरसाठ, वारकरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious programmeधार्मिक कार्यक्रम