शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
4
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
5
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
6
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
7
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
8
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
9
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
10
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
12
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
13
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
14
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
15
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
16
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
17
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
18
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
19
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
20
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री

कोरोना पावला ; आठवीपर्यंतचे साडेनऊ लाख निद्यार्थी हजार विना परीक्षा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ...

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोनाच पावल्याची प्रतिक्रिया दिली असून शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे ९ लाख ६० लाख ५७४ विद्यार्थी विना परीक्षा पास होणार आहे.

राज्यातील शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांंना पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी खूश झाले असले तरी पालकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. कोरोनामुळे मागच्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या, आता सलग दुसऱ्या वर्षी हीच परिस्थिती ओढवल्याने पालक चिंतेत असून कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण होऊ शकते तर ऑनलाईन परीक्षा का नाही, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

पालक म्हणतात.. ऑनलाईन परीक्षेचा पर्याय

कोट- १

विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यासाठी तसेच ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांनी काय ज्ञानार्जन केले आहे, हे तपासण्यासाठी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय आहे. शिक्षण विभागाने याविषयी कोणताही विचार न करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पुनर्विचार करून ऑनलाईन परीक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.

- अंजली शिंदे, पालक

कोट-२

कोरोनाच्या संकट काळातही शाळांनी ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांकडून संपूर्ण शुल्क आकारले आहे. आता परीक्षांच्या माध्यमातून त्यातून विद्यार्थी काय शिकले हे समोर आले असते. मात्र शिक्षण विभागाने परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे परीक्षा थेट रद्द न करता ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळांना सांगितले पाहिजे.

सुदाम देवरे, पालक

कोट-३

ग्रामीण भागात अजूनही काही गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला नाही. अशा काही ठिकाणी शाळाही सुरू आहेत. संबधित शाळांमध्ये योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून परीक्षा घेणे आवश्यक आहे. परंतु, सलग दुसऱ्या वर्षाचही परीक्षा होणार नसतील तर विद्यार्थ्यांना परीक्षांचे गांभीर्यच उरणार नाही.

रमेश गायकर, पालक

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात.

कोट-१

कोरोनाच्या संकटातही शिक्षकांनी वर्षभर अध्यापनाचे काम केले असून सर्वांचीच परीक्षेला सामोरे जाण्याची तयारीही होती. परंतु, सध्याची परिस्थिती विचारात घेता शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. आरटीई कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्यय अतिशय चांगला असून त्याचे स्वागत आहे.

- राजेंद्र निकम, कार्यवाह, नाशिक एज्युकेशन सोसायटी

कोट-२

विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्यासाठी शासनाने स्वयंस्पष्ट असा शासन निर्णय जारी करून या प्रक्रियेविषयी शाळांना शिक्षकांना मार्गदर्शन करावे, त्याचप्रमाणे शासनाने किशोरवयीन मुलांसाठी लस तयार करण्याच्या दृष्टीने विचार करणे आ‌वश्यक असून गेल्या वर्षाप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. मात्र कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने सध्यस्थितीत घेतलेला निर्णय योग्य असून सर्वांनी त्या परिस्थितीत शासनासोबत उभे राहणे आवश्यक आहे.

- नंदलाल धांडे, अध्यक्ष, खासगी प्राथमिक महासंघ नाशिक .

पॉईंटर

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

पहिली -१,१७०४५

दुसरी - १,२१,३४२

तिसरी -१,२०,६१८

चौथी - १,२३,९३९

पाचवी - १,२२,७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी - १,१५,९१०

जिल्ह्यातील शाळा - ५६२६

जिल्ह्यातील शिक्षक -१२, ३२४