शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'कोरोना' संसर्गजन्य आजार; काळजी घेण्याची गरज: डॉ नितीन रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 19:45 IST

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते रावते यांनी दिली. रोग कोणताही असो मात्र त्याबाबत दक्षता घेऊन वेळीच उपचार केले पाहिजेत असेही त्यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगितले.

ठळक मुद्देनागरिकांनीही या संदर्भात दक्षता घेण्याची गरज आहे.महापालिकेच्या वतीने आता जनप्रबोधनाची मोहीम आजाराचा प्रसार आज जगातील 14 देशांमध्ये झाला आहे

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जगात कोरोना या नव्या आजाराविषयी चिंता व्यक्त केली जात असली तरी भारतात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही मात्र यासंदर्भात शासनाने दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते रावते यांनी दिली. रोग कोणताही असो मात्र त्याबाबत दक्षता घेऊन वेळीच उपचार केले पाहिजेत असेही त्यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगितले.प्रश्न - सध्या देशभरात चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोना या रोगाची सद्यस्थिती काय आहेउत्तर- सध्या कोरोना या आजाराची देशभर नव्हे तर जगभरात चर्चा सुरू आहे. या आजाराचा प्रसार आज जगातील 14 देशांमध्ये झाला आहे. भारतामध्ये तशी स्थिती राज्यात निर्माण झालेली नाही मात्र, सरकारच्यावतीने यासंदर्भात काळजी घेतली जात आहे विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यानंतरच त्यांना देशात प्रवेश दिला जात आहे. संशयास्पद रुग्णांना विलगीकरण (स्वतंत्र) कक्षात तपासणीसाठी दाखल करण्यात येते आहे. त्यामुळे भारतात गंभीर परिस्थिती नाही.प्रश्‍न- महाराष्ट्रात या संदर्भात काय काळजी घेतली जात आहे?उत्तर - केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेल्या आदेशानुसार या संसर्गजन्य आजाराबाबत दक्षता घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. राज्यात ठिकाणी वैद्यकीय व्यवसायिकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये सुद्धा या संदर्भात इंडियन इंडियन मेडिकल असोसिएशन च्या मदतीने कार्यशाळा घेण्यात आली. या रोगाची लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाचे स्वॅप घेऊन ते तपासणीसाठी मुंबई येथे शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रश्न - या रोगाची लक्षणे काय आहेत आणि त्याचे गांभीर्य काय आहे?उत्तर- साधारणत: स्वाईन फ्ल्यू प्रमाणेच या रोगाची लक्षणे आहेत. सर्दी खोकला आणि अचानक ताप येणे यातून निमोनिया होणे हे या रोगाचे लक्षण आहे. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे नाशिकमध्येच नव्हे तर राज्यस्तरावर अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात काळजी घेण्यात येत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनीही या संदर्भात दक्षता घेण्याची गरज आहे.प्रश्न- महापालिका या संदर्भात काय काळजी घेत आहे.उत्तर- शासनाच्या आदेशाप्रमाणे आरोग्य उपसंचालकांनी बैठक घेऊन शासकीय यंत्रणांना कार्यवाही करण्यास सांगितले आहे त्यामुळे नाशिक महापालिकेच्या वतीने आता जनप्रबोधनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी दक्षता घेऊन योग्यवेळी वैद्यकिय सल्ला घेतल्यास अडचण होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोनाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य