वादग्रस्त टोलनाके राहणार सुरूच

By Admin | Updated: June 12, 2014 00:28 IST2014-06-12T00:26:57+5:302014-06-12T00:28:33+5:30

टोल धाड चालूच :ज्याचा समावेश तोही प्रस्तावित

The controversial TolaNaka will continue | वादग्रस्त टोलनाके राहणार सुरूच

वादग्रस्त टोलनाके राहणार सुरूच

 

नाशिक : शासनाने राज्यातील जे ४४ टोलनाके बंद करण्याचे जाहीर केले त्यात नाशिक जिल्ह्यातील एकाच टोलनाक्याचा समावेश असून, तोही प्रस्तावित असल्याचे समजते. याशिवाय जिल्ह्यातील अनेक टोलनाके वादग्रस्त असताना त्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत’ या तत्त्वानुसार राज्यात रस्त्यांची बांधणी करण्यात आली खरी; परंतु त्या माध्यमातून होणाऱ्या टोलवसुलीमुळे वाहनचालक वैतागले होते. त्यामुळे मनसेने गेल्या दोन वर्षांत अनेकदा टोलनाक्यांविरोधात तीव्र आंदोलन पुकारले. टोलधोरण जाहीर न करता ४४ टोलनाके बंद करण्यात येत असल्याचे शासनाने घोषित केले; मात्र यामध्ये नाशिक जिल्ह्णातील केवळ एकाच टोलनाक्याचा समावेश असून, त्याचा जिल्ह्णातील वाहनधारकांशी फारसा संबंधही येत नाही. दरम्यान, जिल्ह्णामध्ये सिन्नर-घोटी, शिलापूर, ढकांबे, नांदुरी, चांदवड-मनमाड, येवला- अंदरसूल, भाबडबारी ही वादग्रस्त टोकनाके असून, यातील एकाचाही समावेश बंद केलेल्या टोलनाक्यांमध्ये नसल्याने एकप्रकारे शासनाने ठेंगाच दाखविला आहे. मालेगाव-चाळीसगाव या एकाच टोलनाक्याचा समावेश करण्यात आला असून, या रस्त्याशी वाहनधारकांचा संबंध येतच नाही. जे टोलनाके बंद करण्याची वारंवार मागणी केली जात होती.

Web Title: The controversial TolaNaka will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.