शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पावसाची संततधार, गंगापूर धरण निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 01:52 IST

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ५० टक्केच्याजवळ पोहोचले आहे, तर दारणा धरण ६५ टक्के भरल्याने धरणातून सुमारे ५६८८ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने अवघ्या तीन दिवसांमध्ये धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन गंगापूर धरणातून विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देदिलासा: दारणा धरणातून ५ हजार क्युसेक विसर्ग

नाशिक: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ५० टक्केच्याजवळ पोहोचले आहे, तर दारणा धरण ६५ टक्के भरल्याने धरणातून सुमारे ५६८८ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने अवघ्या तीन दिवसांमध्ये धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन गंगापूर धरणातून विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

जिल्ह्यात उशिरा वरुणराजाने वर्दी दिली आणि संततधार पावसाचा अभिषेक सुरू असल्याने धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. सध्यस्थितीत दारणा, नांदुरमध्यमेश्वर आणि मुकणे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे. तर धरणातील साठ्यात वाढ होऊ लागल्योन शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे.

जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याचे संकट अधिक बिकट होत असल्याने सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असतांना नाशिकला मात्र पावसाने पाठ फिरविल्याने दिवसेंदिवस धरणसाठाही घटत होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाल्याने नाशिककर सुखावले. जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नसला, तरी संततधार पावसानेही धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

रविवारी (दि. १०) दुपारपर्यंत गंगापूर धरणातील पाणीसाठा ४९ टक्केपर्यंत पाेहोचला आहे, तर समूहातील काश्यपी, गौतमी, गोदावरी आणि आळंदी धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे समूहातील पाणीसाठाही ४० टक्के इतका झाला आहे.

--इन्फो--

दारणातून ५६८८ क्युसेक विसर्ग

दारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ६५ टक्केच्या पुढे गेला असून, धरणातून साडेसहा हजार क्युसेक वेगाने विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह कायम राहिल्यास रात्रीतून विसर्ग देखील वाढविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

--इन्फो--

गंगापूर धरणातून अद्याप विसर्ग नाही

गंगापर धरण जवळपास ५० टक्के भरले असले, तरी अद्याप धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. धरणक्षेत्रात सातत्याने बरसणाऱ्या पावासामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढत असल्याने पावसाची परिस्थिती पाहून विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या तीन दिवसांत धरणात १९ टक्कयांनी वाढ झालेली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस