शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पावसाची संततधार, गंगापूर धरण निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 01:52 IST

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ५० टक्केच्याजवळ पोहोचले आहे, तर दारणा धरण ६५ टक्के भरल्याने धरणातून सुमारे ५६८८ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने अवघ्या तीन दिवसांमध्ये धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन गंगापूर धरणातून विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देदिलासा: दारणा धरणातून ५ हजार क्युसेक विसर्ग

नाशिक: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ५० टक्केच्याजवळ पोहोचले आहे, तर दारणा धरण ६५ टक्के भरल्याने धरणातून सुमारे ५६८८ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने अवघ्या तीन दिवसांमध्ये धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन गंगापूर धरणातून विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

जिल्ह्यात उशिरा वरुणराजाने वर्दी दिली आणि संततधार पावसाचा अभिषेक सुरू असल्याने धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. सध्यस्थितीत दारणा, नांदुरमध्यमेश्वर आणि मुकणे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे. तर धरणातील साठ्यात वाढ होऊ लागल्योन शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे.

जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याचे संकट अधिक बिकट होत असल्याने सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असतांना नाशिकला मात्र पावसाने पाठ फिरविल्याने दिवसेंदिवस धरणसाठाही घटत होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाल्याने नाशिककर सुखावले. जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नसला, तरी संततधार पावसानेही धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

रविवारी (दि. १०) दुपारपर्यंत गंगापूर धरणातील पाणीसाठा ४९ टक्केपर्यंत पाेहोचला आहे, तर समूहातील काश्यपी, गौतमी, गोदावरी आणि आळंदी धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे समूहातील पाणीसाठाही ४० टक्के इतका झाला आहे.

--इन्फो--

दारणातून ५६८८ क्युसेक विसर्ग

दारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ६५ टक्केच्या पुढे गेला असून, धरणातून साडेसहा हजार क्युसेक वेगाने विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह कायम राहिल्यास रात्रीतून विसर्ग देखील वाढविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

--इन्फो--

गंगापूर धरणातून अद्याप विसर्ग नाही

गंगापर धरण जवळपास ५० टक्के भरले असले, तरी अद्याप धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. धरणक्षेत्रात सातत्याने बरसणाऱ्या पावासामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढत असल्याने पावसाची परिस्थिती पाहून विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या तीन दिवसांत धरणात १९ टक्कयांनी वाढ झालेली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस