शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात 

By suyog.joshi | Updated: June 6, 2024 16:57 IST

 जुन्या नाशकात मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाला याबाबत ...

 जुन्या नाशकात मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाला याबाबत कल्पना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दूषित पाणीपुरवठा थांबला नाही, तर मनपावर मोर्चा काढत जाब विचारला जाईल, असा इशारा काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष डाॅ. वसंत ठाकूर यांनी दिला आहे. जुन्या नाशिकमधील पाटील गल्ली, बुधवार पेठ, संभाजी चौक, गजराज चौक, कुंभारवाडा, काझी गडी, नानावली, फकीरवाडी, कथडा, छपरीची तालीम, नाईकवाडी, चव्हाटा, पेठ म्हसरूळ टेक, तांबट लाइन या भागामध्ये सतत दूषित मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे.

आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्यातही दूषित गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. वरील भागात अनेक ठिकाणी लहान मुलं व वयोवृद्ध नागरिक आजारी पडले आहेत. लहान मुलांमध्ये काॅलरा, डायरिया याची साथ पाहायला मिळत आहे. दूषित पाणीपुरवठा त्वरित थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सेवा दलामार्फत देण्यात आला.स्मार्ट सिटीच्या नावाखाली जागोजागी खोदकाम करून पाण्याच्या पाइपलाइन फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. दुसरीकडे कमी दाबाने पाणी नागरिकांना द्यायचे आणि तेही दूषित पाणीपुरवठा. हे थांबले पाहिजे.-- डॉ. वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, काँग्रेस सेवा दल 

टॅग्स :Nashikनाशिक