शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

कंटेनेरने देवीभक्तांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 17:59 IST

सिन्नर : नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील देवीभक्तांना कंटेनेरने चिरडल्याची घटना नांदूरशिंगोटे शिवारात निमोण रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ घडली.

सिन्नर : नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील देवीभक्तांना कंटेनेरने चिरडल्याची घटना नांदूरशिंगोटे शिवारात निमोण रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ घडली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सदर भीषण अपघात झाला. यात दोन देवीभक्तांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नाशिक व संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अन्य १५ भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.इगतपुरी तालुक्यातील विल्होळी जवळील सारुळ येथे भवानी मातेचे मंदिर आहे. सारुळ परिसरातील सांजेगाव, लहांगेवाडी व अन्य गावातील युवक ट्रक घेऊन रविवारी (दि. ७) रोजी तुळजापूर येथे गेले होते. तुळजापूर येथून मशालज्योत घेऊन धावत व सोबत तीन दुचाकीसह युवक इगतपुरी तालुक्याकडे कूच करीत होते. नांदूरशिंगोटे गावाजवळ रस्त्याच्या कडेला थांबून मशालीत तेल टाकण्यासाठी व ज्योतीची काजळी काढण्यासाठी धावणारे युवक व त्यांच्यासोबत असलेले दुचाकीवरील युवक थांबले होते. त्यांच्यासोबत असणारा ट्रकही रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. काही युवक ट्रकखाली उतरले होते.याचवेळी लोणीकडून नांदूरशिंगोटेकडे येणाºया कंटेनेरने (क्र. एम. एच. ०४ जी. सी. ६८७) रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन दुचाकींना व उभ्या असलेल्या युवकांना चिरडले. त्यानंतर एक दुचाकी कंटेनेरमध्ये अडकली. सदर कंटेनेरने दुचाकी सुमारे एक किलोमीटर नांदूरशिंगोटे गावापर्यंत फरफटत नेली.या अपघात अक्षय शिवाजी बोकुड (२२) रा. सांजेगाव ता. इगतपुरी व बबन गोविंदराव खंदाळे (२३) रा. लहांगेवाडी ता. इगतपुरी हे जागीच ठार झाले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अन्य जखमींना संगमनेर व नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.या अपघातात गोरख तुकाराम डगळे, अनिल रामदास भोईर, समाधान मधु शिंदे, प्रकाश पांडू गुंड, गौरव संजय ढगे, हिरामण गोटे, रवी लहू भोईर, विनोद अशोक तांबडे, मच्छिंद्र लक्ष्मण भोईर, राजाराम लक्ष्मण आचारी यांच्यासह अन्य आठ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनेरचालक फरार झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात कंटेनेर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, शशिकांत उगले, नवनाथ शिंदे, उमेश खेडकर, प्रकाश सोनवणे तपास करीत आहेत.चौकट- नांदूरशिंगोटे येथे घेणार होते विश्रांती..तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणारे युवक नांदूरशिंगोटे येथे काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा इगतपुरी तालुक्याकडे प्रस्थान करणार होते. काही मिनिटांसाठी मशालीत तेल टाकण्यासाठी ते निमोण रस्त्याजवळील उड्डाण पुलाजवळ थांबले होते. याच काळात त्यांच्यावर काळाने घाला घातला. 

टॅग्स :Accidentअपघात