शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनेरने देवीभक्तांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 17:59 IST

सिन्नर : नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील देवीभक्तांना कंटेनेरने चिरडल्याची घटना नांदूरशिंगोटे शिवारात निमोण रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ घडली.

सिन्नर : नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील देवीभक्तांना कंटेनेरने चिरडल्याची घटना नांदूरशिंगोटे शिवारात निमोण रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ घडली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सदर भीषण अपघात झाला. यात दोन देवीभक्तांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नाशिक व संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अन्य १५ भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.इगतपुरी तालुक्यातील विल्होळी जवळील सारुळ येथे भवानी मातेचे मंदिर आहे. सारुळ परिसरातील सांजेगाव, लहांगेवाडी व अन्य गावातील युवक ट्रक घेऊन रविवारी (दि. ७) रोजी तुळजापूर येथे गेले होते. तुळजापूर येथून मशालज्योत घेऊन धावत व सोबत तीन दुचाकीसह युवक इगतपुरी तालुक्याकडे कूच करीत होते. नांदूरशिंगोटे गावाजवळ रस्त्याच्या कडेला थांबून मशालीत तेल टाकण्यासाठी व ज्योतीची काजळी काढण्यासाठी धावणारे युवक व त्यांच्यासोबत असलेले दुचाकीवरील युवक थांबले होते. त्यांच्यासोबत असणारा ट्रकही रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. काही युवक ट्रकखाली उतरले होते.याचवेळी लोणीकडून नांदूरशिंगोटेकडे येणाºया कंटेनेरने (क्र. एम. एच. ०४ जी. सी. ६८७) रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन दुचाकींना व उभ्या असलेल्या युवकांना चिरडले. त्यानंतर एक दुचाकी कंटेनेरमध्ये अडकली. सदर कंटेनेरने दुचाकी सुमारे एक किलोमीटर नांदूरशिंगोटे गावापर्यंत फरफटत नेली.या अपघात अक्षय शिवाजी बोकुड (२२) रा. सांजेगाव ता. इगतपुरी व बबन गोविंदराव खंदाळे (२३) रा. लहांगेवाडी ता. इगतपुरी हे जागीच ठार झाले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अन्य जखमींना संगमनेर व नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.या अपघातात गोरख तुकाराम डगळे, अनिल रामदास भोईर, समाधान मधु शिंदे, प्रकाश पांडू गुंड, गौरव संजय ढगे, हिरामण गोटे, रवी लहू भोईर, विनोद अशोक तांबडे, मच्छिंद्र लक्ष्मण भोईर, राजाराम लक्ष्मण आचारी यांच्यासह अन्य आठ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनेरचालक फरार झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात कंटेनेर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, शशिकांत उगले, नवनाथ शिंदे, उमेश खेडकर, प्रकाश सोनवणे तपास करीत आहेत.चौकट- नांदूरशिंगोटे येथे घेणार होते विश्रांती..तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणारे युवक नांदूरशिंगोटे येथे काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा इगतपुरी तालुक्याकडे प्रस्थान करणार होते. काही मिनिटांसाठी मशालीत तेल टाकण्यासाठी ते निमोण रस्त्याजवळील उड्डाण पुलाजवळ थांबले होते. याच काळात त्यांच्यावर काळाने घाला घातला. 

टॅग्स :Accidentअपघात