शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

नदीपात्रात भिंतीची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:14 AM

येथील पुरातन ऐश्वर्य मंदिराला वाहत्या पाण्याने धोका निर्माण होऊ नये यासाठी सरस्वती नदीपात्रात मंदिराच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती  घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिरास संरक्षक भिंतही बांधण्यात येत आहे.

सिन्नर : येथील पुरातन ऐश्वर्य मंदिराला वाहत्या पाण्याने धोका निर्माण होऊ नये यासाठी सरस्वती नदीपात्रात मंदिराच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती  घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिरास संरक्षक भिंतही बांधण्यात येत आहे.  राष्ट्रीय पुरातत्व विभागाकडून मंदिर संरक्षणासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे ८ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. सरस्वती नदीपात्राच्या शेजारी हे ऐतिहासिक मंदिर असून, उंचावर असणाºया या मंदिराच्या संरक्षक भिंतीची नदीला पूर आल्यानंतर पडझड होत असते. त्यातून मंदिराला धोका होऊ नये यासाठी पुरातत्व विभाग काळजी करू लागल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे.  पुरातत्व विभागाचे कार्यालय औरंगाबाद येथे असून, तेथीलच ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या ठेकेदाराने आपल्याच भागातील मजूर या कामासाठी आणले असून, या कामगारांनी आपले पाल मंदिराच्याच आवारात टाकले आहे. दिवस-रात्र हे मजूर तेथेच राहात असल्याने मार्चपूर्वी हे काम पूर्ण होण्यात कुठलीही अडचण येण्याची शक्यता नाही.  या कामासाठी डबर, वाळू, सीमेंट स्थानिक पातळीवरच खरेदी करण्यात आले असून, बाजारात वाळूची टंचाई जाणवत असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.  पुरातत्व विभाग हे ऐश्वर्य मंदिर आपले आहे, या भावनेतून मंदिरासह त्याच्या परिसराला धोका होऊ नये यासाठी काळजी घेऊ लागल्याने भाविकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.साडेआठ फूट उंचीची दगडी भिंतसरस्वती नदीपात्रात मंदिराच्या बाजूने जवळपास दीड मीटर रुंदीची आणि साडेआठ फूट उंचीची दगडी भिंत उभारण्यात येत आहे. नदीपात्रात जवळपास दीड मीटर खोल नळी खोदून त्यावर या संरक्षक भिंतीचे काम करण्यात येत आहे. सुमारे ५० मीटर लांब अशी ही दगडी भिंत असणार आहे. मंदिराच्या बाजूने ती नदीपात्रापासून आठ फुटापर्यंत सरळ उंच जाणार असली तरी नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाचा मारा तिला सहन व्हावा यासाठी ही भिंत वरच्या बाजूने निमुळती होत जाणार आहे.

टॅग्स :riverनदी